राष्ट्रीय गुणवत्ता यादीत महाराष्ट्र आठव्या स्थानी, देशाच्या तुलनेत राज्य आघाडीवर

या अहवालात विद्यार्थ्यांच्या भाषा, गणित, परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयांतील ज्ञान, समज व उपयोग करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले. तिसरीतील विद्यार्थ्यांची भाषा विषयातील आकलन क्षमता पातळी ६९ टक्के असून, ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे. गणितात विद्यार्थ्यांनी ६४ टक्के मिळवून चार टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.

राष्ट्रीय गुणवत्ता यादीत महाराष्ट्र आठव्या स्थानी, देशाच्या तुलनेत राज्य आघाडीवर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारच्या 'परख' अहवालानुसार (PARKH Report) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पातळी देशाच्या सरासरीपेक्षा ६ टक्क्याहून अधिक आहे. महाराष्ट्र राज्याची गुणवत्ता पातळी (Maharashtra Student Quality Level) ५५ टक्के एवढी नोंदविण्यात आली आहे. तर एकूण देशाची गुणवत्ता पातळी ४९ टक्के एवढी आहे. या अहवालात महाराष्ट्रातील तिसरीतील विद्यार्थी देशात सहाव्या, सहावीचे विद्यार्थी सातव्या, तर नववीतील विद्यार्थी १० व्या क्रमांकावर नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये राज्याचा देशात आठवा क्रमांक (Maharashtra state ranks 8th in the country) आहे.

शिक्षकांच्या मागण्या मान्य, आंदोलन मागे; ऑगस्ट महिन्यात वाढ

हा अहवाल नुकताच केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. या अहवालात विद्यार्थ्यांच्या भाषा, गणित, परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयांतील ज्ञान, समज व उपयोग करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले. तिसरीतील विद्यार्थ्यांची भाषा विषयातील आकलन क्षमता पातळी ६९ टक्के असून, ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे. गणितात विद्यार्थ्यांनी ६४ टक्के मिळवून चार टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.

सहावीत भाषेची गुणवत्ता पातळी ६२ टक्के, गणितात ५१ टक्के आणि परिसर अभ्यासात ५५ टक्के आहे. ९ वीत भाषेतील पातळी ५९ टक्के, गणितात ३८, तर सामाजिक शास्त्रात ४३ टक्के आहे. या सर्वेक्षणामध्ये राज्यातील ४ हजार ३१४ शाळांतील १ लाख २३ हजार ६५९ विद्यार्थी व १३ हजार ९३० शिक्षकांनी सहभाग नोंदविला. एकूणच महाराष्ट्राने ५५ टक्केवारीची सरासरी कामगिरी करीत राष्ट्रीय सरासरी ४९ टक्केवारीपेक्षा सरस यश मिळवले आहे.