विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी संस्था चालकांनी राज्याचा लौकिक वाढवावा; शिक्षणमंत्री

अमरावती येथे जिल्हा नियोजन भवनात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा आढावा आणि उपक्रमशील शिक्षकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिक्षण क्षेत्रातील बहुसंख्य अधिकाऱ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती, त्यावेळी दादा भुसे बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी संस्था चालकांनी राज्याचा लौकिक वाढवावा; शिक्षणमंत्री

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण संस्थेचे यश व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी संस्था चालकांनी शिक्षण पद्धतीत सक्रिय सहभाग घेऊन या क्षेत्रात राज्याचा लौकिक (The reputation of the state) निर्माण करण्यास पुढे यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse) यांनी केले आहे.  अमरावती येथे जिल्हा नियोजन भवनात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा आढावा (Review of officials in the education department) आणि उपक्रमशील शिक्षकांचे चर्चासत्र आयोजित (Organizing a seminar) करण्यात आले होते. यावेळी शिक्षण क्षेत्रातील बहुसंख्य अधिकाऱ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती, त्यावेळी दादा भुसे बोलत होते 

उपक्रमशील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात प्रदिर्घ सेवा देणाऱ्यांकडून नाविण्यपूर्ण सूचना प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने शासकीय शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी आलेल्या सूचनांची राज्यव्यापी अंमलबजावणी जाणीवपूर्वक करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.

मंत्री भुसे यांनी सांगितले की, विद्यादानाचे कार्य करणारे शिक्षण हे मानबिंदू आहेत. असंख्य अडचणी आणि समस्यांचा सामना करीत शिक्षक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबतही समिती स्थापन करण्यात आली आहे. 

शिक्षक, संस्थाचालक यांच्या अडचणींची नोंद घेण्यात आली आहे. याबाबत येत्या काळात निर्णय घेण्यात येतील. शाळा भेटीतून स्वच्छता, पोषण आहार आदींबाबत कार्यवाही व्हावी, अनूचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासोबतच शिक्षक प्रतिकुल परिस्थितीमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. याची दखल घेऊन चांगले कार्य करणाऱ्यांचे कौतुक करण्यात येईल, असे दादा भुसे म्हणाले. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला समोर जाताना टप्प्याने सीबीएसईमध्येही शिक्षण देण्यात येणार आहे. यासोबतच स्थानिक विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक सुधारणा करताना लोकसहभाग महत्वाचा आहे. यातून शैक्षणिक समस्यांसह विद्यार्थ्यांचे आरोग्याचे प्रश्नही मार्गी लावण्यात यावेत. जिल्हा नियोजनमधून शालेय शिक्षणासाठी तीन टक्के निधी राखीव आहे. यातून शाळा दुरूस्ती, नवीन वर्गखोल्या बांधकाम हाती घेण्यात यावे. यावर्षीपासून शाळांच्या संरक्षण भिंती बांधण्याचे काम रोहयोमधून करण्यात येणार आहे. तसेच शाळांनी जलजीवन मिशनमधून पिण्याच्या पाण्याची सोय करावी. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री दादा भुसे यांनी केले.