फेरतपासणीत दहावीच्या विद्यार्थ्याचे तब्बल ११ गुण वाढले टक्केवारी झाली ९९. ८०
बोर्डाकडून १ जून रोजी गणित विषयात मिळालेल्या गुणांची बेरीज तपासली असता १०० पैकी १०० गुण असल्याचे आढळून आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य मंडळाच्या (State Board) वतीने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत (10th exam) उत्तरपत्रिकेची फेर तपासणी (Rechecking of answer sheet) करण्यासाठी अवधी देण्यात आला होता. यात अनेक विद्यार्थ्यांनी (student) फेर तपासणीसाठी आपला पेपर दिला. त्यात अक्कलकोटमधील इंडियन मॉडेल स्कूलच्या यथार्थ पाटील या विद्यार्थ्याचा उत्तरपत्रिका गुणांच्या पुनर्मूल्यांकन अंती तीन विषयात चक्क ११ गुण वाढून निकाल ९९.८० टक्केवर पोहोचला. तसेच त्याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
इयत्ता दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाला होता. तेव्हा ९०.४० टक्के गुण मिळाले. या विद्यार्थ्याला त्याच्या पेपर मध्ये शंका निर्माण झाली त्यानंतर त्यांनी उत्तरपत्रिकेतील गुणांच्या बेरजेसाठी व तीन विषयातील गुण वाढण्याच्या आत्मविश्वासावर फोटोकॉपीची मागणी केली. त्यानंतर बोर्डाकडून १ जून रोजी गणित विषयात मिळालेल्या गुणांची बेरीज तपासली असता १०० पैकी १०० गुण असल्याचे आढळून आले.
यथार्थने कुठेही क्लासेस न लावता ९९.८० टक्के गुण मिळविले. नियमित अभ्यास केला विशेषतः शेवटचे तीन महिने जास्त प्रमाणात अभ्यास केला. पुढे विज्ञान शाखेत यथार्थला अकरावीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्याचबरोबर आयआयटीमधून इंजिनिअर करण्याचा मानस आहे. याव्यतिरिक्त घरी आई - वडिलांसह आजी, आत्या मामा, मावशीबरोबरच शाळेतील शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले असेही यतार्थ सांगतो.