एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
रखडलेले निकाल, प्रश्नपत्रिकेतील चुका, परीक्षांचे सतत बदलते वेळापत्रक आणि जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटींमुळे सतत वादात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कारभारातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षेदरम्यान २ हजार ६५६ गैरप्रकारांची नोंद (In the last three years, 2 thousand 656 malpractices were recorded during various examinations of Mumbai University) झाल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. (It has been revealed through Right to Information) यानंतर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेसंबंधित यंत्रणेबाबतच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माहितीच्या अधिकारातून उघड झालेल्या धक्कादायक माहितीनुसार सर्वाधिक म्हणजे १ हजार २३६ गैरप्रकारांची नोंद ही वाणिज्य शाखेच्या (Department of Commerce) परीक्षेदरम्यान झाली. त्यानंतर विज्ञान शाखेच्या (Department of Science) ६०० आणि कला शाखेच्या (Department of Arts) परीक्षेदरम्यान ३४६ गैरप्रकारांची नोंद झाली. तर सर्वात कमी ९४ गैरप्रकारांची नोंद विधि शाखेच्या (Faculty of Law) परीक्षेदरम्यान झाली आहे.
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत विद्यापीठाच्या परीक्षेतील गैर प्रकारांबद्दल माहिती माहिती मागवली होत. यामध्ये मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ते २०२४-२५ या चार वर्षांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या विविध विद्याशाखांच्या परीक्षेदरम्यान प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे घडलेल्या गैरप्रकारांची सत्र आणि वर्षनिहाय सांख्यिकी माहिती देण्यात आली आहे.
या माहितीनुसार, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अंतर्गत असणाऱ्या ‘अनफेअर मिन्स एनक्वायरी युनिट’ या विभागाकडून २०२२ ते २०२४ या तीन वर्षात विविध विद्याशाखांच्या परीक्षेदरम्यान घडलेल्या गैरप्रकारांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काही विद्यार्थी हे चुकीच्या मार्गाचा वापर करून उत्तीर्ण होतात. हा गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे गैरप्रकारांकडे लक्ष देऊन नियमाच्या आधारे कारवाई करणे गरजेचे आहे. जेणेकरून परीक्षेसंबंधित प्रक्रिया सुरळीतपणे होऊन मूल्यांकनही व्यवस्थित होईल’, असे मत विहार दुर्वे यांनी व्यक्त केले आहे.