सामाजिक शास्त्रामध्ये नवीन संधी शोधणे काळाची गरज : डॉ. प्रकाश पवार
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) माणसाला मदत करू शकते पण ती माणसाच्या संपूर्णतेला पर्याय ठरू शकत नाही कारण माणूस हे एक अद्वितीय अस्तित्व आहे ज्याला एकापेक्षा जास्त बुद्धिमत्ता असू शकते. (उदाहरणार्थ, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, तार्किक बुद्धिमत्ता इत्यादी), ते कृत्रिम बुद्धिमत्तेत पूर्णपणे नाही.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांनी निरीक्षण, संवाद व चर्चा (Observation, communication and discussion) या माध्यमातून जीवनाचा अनुभव घेतला तर सामाजिक शास्त्रातील विषयांना (Subjects in Social Sciences) व या ज्ञानशाखेला नवीन उर्जा मिळू शकते. यासाठी ज्ञानाचे बहुपैलूत्व लक्षात घेणे आवश्यक (Multidimensionality of knowledge must be taken into account) आहे. सामाजिक शास्त्रामध्ये नवीन संधी शोधणे आता काळाची गरज (Finding new opportunities in social science is the need of the hour) आहे, असे प्रतिपादन सामाजिक शास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार (Social science scholar Prof. Dr. Prakash Pawar) यांनी केले.
शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात 'सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळाच्या' वतीने ' आयोजित सामाजिक शास्त्रातील आव्हाने आणि संधी' या विषयावर जेष्ठ विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते, उपप्राचार्य. प्रा.एच.एस. जाधव, प्राध्यापक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. प्रकाश पवार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) माणसाला मदत करू शकते पण ती माणसाच्या संपूर्णतेला पर्याय ठरू शकत नाही, कारण माणूस हे एक अद्वितीय अस्तित्व आहे. ज्याला एकापेक्षा जास्त बुद्धिमत्ता असू शकते. (उदाहरणार्थ, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, तार्किक बुद्धिमत्ता इत्यादी), ते कृत्रिम बुद्धिमत्तेत पूर्णपणे नाही. तसेच सामाजिक शास्त्रातील असणाऱ्या संधी, सामाजिक शास्त्रातील नवे प्रवाह, कृत्रिम बुद्धिमत्तेचा रोजगारावर होणारा परिणाम, भाषा, ज्ञान, भारतीय संविधानाचे महत्त्व, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान यासंदर्भातही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, या व्याख्यानाचे प्रास्ताविक सामाजिक शास्त्रे अभ्यास मंडळाचे समन्वयक डॉ.एन.एस. पाडळकर यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय डॉ. प्रभुणे यांनी करून दिला. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.के.सी. मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. क्रांती पैठणकर तर या आभार प्रा. गाडेकर यांनी मानले.