अकरावीच्या विद्यार्थिनींकडून बारावी बोर्डाच्या पेपरची तपासणी? पुन्हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल.. 

या विद्यार्थिीनी उत्तरपत्रिका तपासत नसल्या तरी, त्यांच्याकडे एवढ्या मोठा महत्त्वाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका गेल्या कशा? असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या विद्यार्थिनी बारावी बोर्डासारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका हाताळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अकरावीच्या  विद्यार्थिनींकडून बारावी बोर्डाच्या पेपरची तपासणी? पुन्हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात एक घटनेमुळे बारावी परीक्षेच्या विश्वासहार्तेवर प्रश्नचिन्ह (A Question Mark Over Credibility) निर्माण करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दहिवडी येथील दहिवडी कॉलेजमध्ये (Dahiwadi College) बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका (12th Grade Board Exam Answer Sheets) अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींकडून हाताळण्यात आल्याचा व्हिडिओ (Video of handling a female student) सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.या पूर्वीही अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर संबंधित शिक्षकांवर कारवाई झाली होती.

दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे शिक्षण व्यवस्था आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेचा अधिकृत खुलाला करण्यात आला नसला तरी व्हिडीओमध्ये शिक्षिका विद्यार्थिनींना काय करायचे? याबद्दल सांगताना दिसत आहे आणि चार ते पाच विद्यार्थिंकडे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. 

या विद्यार्थिीनी उत्तरपत्रिका तपासत नसल्या तरी, त्यांच्याकडे एवढ्या मोठा महत्त्वाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका गेल्या कशा? असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या विद्यार्थिनी बारावी बोर्डासारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका हाताळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

संबंधित शिक्षिकेने अर्थशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणी करताना अकरावीच्या काही विद्यार्थिनींना मदतीसाठी बसवले. या विद्यार्थिनींकडून थेट पेपर तपासून घेण्यात आल्याची चर्चा असून हा प्रकार समोर आल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर पत्रिका अन्य कोणालाही हाताळण्याची कायद्याने परवानगी नसते त्यामुळे जर कोणी बारावीची उत्तर पत्रिका हाताळत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरू शकतो. या प्रकारावर शिक्षण विभाग काय कारवाई करतंय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.