दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करण्याचे दिशेने सरकारकडून पाऊल उचलले जात आहेत. त्या दृष्टीने योजना राबवण्यासाठी त्यांनी रूपरेषा तयार केली आहे. राज्यात दीड लाख सरकारी नोकर भरतीचे देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी सरकारची पुढील दिशा कशी असेल, याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करण्याचे दिशेने सरकारकडून पाऊल उचलले जात आहेत. त्या दृष्टीने योजना राबवण्यासाठी त्यांनी रूपरेषा तयार केली आहे. राज्यात दीड लाख सरकारी नोकर भरतीचे (1.5 lakh government employees recruited) देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.
राज्यात विविध योजना राबवण्यासह तरूणांना सरकारी नोकरी मिळेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील तरूणांसाठी लवकरच १.५ लाख रोजगार उपलब्ध करण्यात येतील, त्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, असे आदेश त्यांनी अधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांसाठी लवकरच बंपर भरती निघणार असल्याचे बोलले जात आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..
'आधीच्या सरकारी कर्मचाऱ्यांची बढती प्रक्रिया पूर्ण करा. नंतर नवीन भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात करा. तसेच नवीन भरती आणि विद्यमान कर्मचाऱ्यांना डोमेन ज्ञान आणि तंत्रज्ञान अवलंबन यावर लक्ष केंद्रीत करणारे सर्वसमावेशक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करा,' असे देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना यांनी सांगितले.