बारावी परीक्षेदरम्यान CCTV बंद करणाऱ्या केंद्र संचालकांचे निलंबन

परीक्षेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून गैरप्रकार केल्याप्रकरणी एका केंद्र संचालकावर निलंबनाची कार्यवाही केली जात आहे. शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियानांतर्गत पारदर्शक परीक्षेसाठी कठोर पावले उचलले जात आहेत.

बारावी परीक्षेदरम्यान CCTV बंद करणाऱ्या केंद्र संचालकांचे निलंबन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जात असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या दरम्यान गैरप्रकार करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षण विभागातील 34  कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यातच परीक्षेदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून गैरप्रकार केल्याप्रकरणी एका केंद्र संचालकावर निलंबनाची कार्यवाही केली जात आहे. शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियानांतर्गत पारदर्शक परीक्षेसाठी कठोर पावले उचलले जात आहेत,अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू असून राज्य शासनातर्फे कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे मात्र काही परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉफीच्या घटना घडल्याचे समोर आले त्यानंतर शिक्षण विभागाने या घटनांची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. त्यातच हिंगोली जिल्ह्यातील बस्मत येथील एका परीक्षा केंद्रावर काही कालावधी करिता cctv बंद ठेवले होते. त्यात वीज पुरवठा खंडित झालेला नसताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद का ठेवण्यात आले असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यात केंद्र संचालक दोषी असल्याचे आढळून आले त्यामुळे संबंधित आवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे.

बीड, जैतापूर कन्नड, तसेच वाशिम येथील तो जुमडा या ठिकाणी झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणी दोषीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत 109 गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सामूहिक कॉपी झालेल्या परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासून किती विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली आहे, याची तपासणी करून विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांमध्ये नियमानुसार गुणदान केले जाणार आहे,असेही बेडसे यांनी सांगितले.