बार्टी, सारथी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या : नितिन गडकरी

राज्य सरकारव्दारा विद्यार्थ्यांना सरसकट स्कॉलरशिप देणे गरजेचे आहे.

बार्टी, सारथी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या : नितिन गडकरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात संशोधक विद्यार्थ्यांवर इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत कमी निधी खर्च केला जातो.बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या (Barti, Sarathi and Mahajyoti) माध्यमातून पीएचडी करणा-या संशोधक विद्यार्थ्यांना (Research students) राज्य सरकारने अटी शिथील करुन स्कॉलरशिप देण्याची आवश्यकता आहे,त्यामुळे राज्यात पीएचडी धारकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.राज्य सरकारव्दारा विद्यार्थ्यांना सरसकट स्कॉलरशिप देणे गरजेचे आहे, असे पत्र (Letter) केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांना दिले आहे.

राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी येत्या 10 जानेवारी रोजी फेलोशिप चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे.मात्र, परीक्षा न घेता सरसकट फेलोशिप द्यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात आहे.राज्यात शिवसेना- भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाची सत्ता असून बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या प्रत्येकी विद्यार्थ्यांना 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हा निर्णय मागे घेण्यासाठी विद्यार्थी व विरोध शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.त्यात आता राज्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना  पत्र लिहून एकप्रकारे घरचा आहेर दिला असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा : सेट परीक्षा ७ एप्रिलला, अर्ज किती तारखेपासून भरता येणार ; सविस्तर वेळापत्रक

बार्टी, सारथी आणि महाज्योती सारख्या माध्यमांतून पीएचडी करणा-या संशोधक विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारकडून मदत नसल्याचे विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी निवेद दिले होते.त्यावर गडकरी यांनी  चंद्रकांत पाटील पत्र लहिले आहे.त्यात पी.एचडी. करणाऱ्या प्रत्येक संशोधकाला समाजातील, देशातील प्रमुख अडचणी, दुखणी, कमतरता यावर शास्त्रशुध्द संशोधन करणे, डेटा संकलन करुन संशोधनाची मांडणी करावी लागते. दोन रिसर्च आर्टिकल्स, रिसर्च पेपर लिहिणे, यांकरिता पी.एचडी. करणाऱ्यांना मेहनत घ्यावी लागते.या विद्यार्थ्यांना राज्य सरकारव्दारा सरसकट स्कॉलरशिप देणे गरजेचे आहे.परंतू पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

पीएचडी करणारे संशोधक विद्यार्थी हे गॅज्युएट झाल्यानंतर आणि दोन वर्षे मास्टर झाल्यावर पीएचडी करण्याकरीता किमान 55 टक्के गुण असण्याची अट आहे व या अटीची पूर्तता झाल्यावर देखील अॅडमिशन मिळणे सोपे नाही, त्याकरीता अनेक परिक्षा देणे गरजेचे आहे. तसेच पीएचडी करीता गाईड मिळणे देखील एक कठीण काम आहे.त्यामुळे याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.तरी याबाबत आपण आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा,असे गडकरी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.