बीएएमएस विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राचे निवासी असलेले परंतु अन्य राज्यातून बीएएमएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी आता राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Meet CM Eknath Shinde) यांच्या भेटीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा झाली. ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेतली असून महाराष्ट्रातील बीएएमएसच्या (BAMS) विद्यार्थ्यांसांठी आनंदाची आहे. बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (बीएएमएस) पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेले परंतु अन्य राज्यातून बीएएमएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी आता राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळणार (BAMS students will get admission through state quota for postgraduate Ayurvedic education) असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
यापु्र्वी महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. मात्र, शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे सूचवले आहे. त्यासाठी, पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्ष बीएएमएस च्या विद्यार्थ्यांवर होणार अन्याय यानिमित्ताने दूर होणार आहे.
राज्याच्या 85% कोटा (शासकीय व खाजगी अनुदानित) आणि 70% कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे. त्यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासूनची बीएएमएसच्या विद्यार्थ्यांची मागणी आजच्या राजभेटीमुळे पूर्णत्वास आली असल्याने महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.