बीएड प्रवेश परीक्षेळी नियोजन शून्य कारभार ,परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी
राज्यात १ लाख १० हजार ४२ विद्यार्थी बीएडची प्रवेश परीक्षा देणार असून ही परीक्षा २७ ते २९ मार्चदरम्यान विविध सत्रात घेतली जाणार आहे. ही सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे शैक्षणिक वर्षे २०२६-२७ (Academic Year 2026-27) साठी घेतल्या जाणाऱ्या बॅचलर ऑफ एज्युकेशन - बीएड (जनरल व स्पेशल) आणि बीएड (इएलसीटी) या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला (BEd Course Exam) आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, नांदेड शहरातील एका इंटरनॅशनल स्कूल परीक्षा केंद्रावर नियोजनाचा मोठा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा सुरू होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये नेटवर्क गेलं, त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळाचे (Confusion at the exam center) वातावरण पाहायला मिळाले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
परीक्षा केंद्राची आसनक्षमता केवळ ३०० असताना तब्बल ६०० विद्यार्थ्यांना एकाच वेळी येथे बोलावल्याने अर्ध्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. परीक्षेची वेळ सकाळी ११ ते १२:३० अशी असतानाही अनेक तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकली नाही. ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या नेटवर्क सुविधेचा केंद्रावर पूर्णतः अभाव होता. अनेक विद्यार्थ्यांना एक-दोन प्रश्न सोडवताच सर्व्हर डाऊन झाल्याने बाहेर थांबावे लागले. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी आणि तांत्रिक बिघाड यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.
केवळ तांत्रिक बिघाडच नाही, तर हॉल तिकीट तपासणी आणि ओळख पडताळणीसाठीही केंद्रावर पुरेशी यंत्रणा नव्हती. ओळख पडताळणीमध्ये झालेल्या दिरंगाईमुळे मौल्यवान वेळ वाया गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर अपुऱ्या व्यवस्थेमुळे शैक्षणिक नुकसान झाले असून, राज्य सामायिक परीक्षा कक्षाने या प्रकरणाची दखल घेऊन फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.
राज्यात १ लाख १० हजार ४२ विद्यार्थी बीएडची प्रवेश परीक्षा देणार असून ही परीक्षा २७ ते २९ मार्चदरम्यान विविध सत्रात घेतली जाणार आहे. ही सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे.