बांगलादेशात विद्यार्थ्यांची निदर्शने; पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश; न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष 

कोटा पद्धतीवरून सुरू असलेल्या गदारोळात बांगलादेशचे सर्वोच्च न्यायालय वादग्रस्त नोकरीचा कोटा रद्द करायचा की नाही यावर निर्णय देणार आहे.

बांगलादेशात विद्यार्थ्यांची निदर्शने; पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश; न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बांगलादेशात विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन  (Violent protests by students) सातत्याने वाढत आहे. देशातील वाढत्या हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला असून बांगलादेशच्या रस्त्यावर सैनिकांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. सरकारही आता ॲक्शन मोडमध्ये (Government action mode) आले असून कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश (Orders to shoot) पोलिसांना दिले आहेत. तर दुसरीकडे, कोटा पद्धतीवरून सुरू असलेल्या गदारोळात बांगलादेशचे सर्वोच्च न्यायालय (Bangladesh Supreme Court) वादग्रस्त नोकरीचा कोटा रद्द (Job quota cancelled) करायचा की नाही यावर निर्णय देणार आहे.

बांगलादेशातील १ हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थी विविध सीमेवरून किंवा हवाई मार्गाने भारतात परतले आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही यावर निवेदन केले आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे आश्वासन दिले.

यामुळे होत आहेत हिंसक आंदोलने 

सरकारी नोकऱ्यांमधील कोटा प्रणालीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे बांगलादेशची राजधानी ढाका आणि इतर ठिकाणी हिंसाचार वाढला. आंदोलक कोटा प्रणाली रद्द करण्याची मागणी करत आहेत, ज्या अंतर्गत 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानविरुद्ध लढलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जाते.