PSI परीक्षेत अमोल घुटूकडे राज्यात प्रथम; आई-वडीलांचा आनंद गगनात मावेना..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा अंतिम नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सातारच्या अमोल घुटूकडे याने राज्यात प्रथम पटकावला आहे.

PSI परीक्षेत अमोल घुटूकडे राज्यात प्रथम; आई-वडीलांचा आनंद गगनात मावेना..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC)  २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेचा अंतिम नुकताच निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सातारच्या अमोल घुटूकडे (Amol Ghatukade) याने राज्यात प्रथम पटकावला (First in the state) आहे. अमोलने सांगली येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. नोकरी लागली मात्र लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद पडली आणि नोकरी गेली. मग थेट गावाकडे मोर्चा वळवला. दिवड गावी आल्यानंतर एमपीएससीचा अभ्यास करण्याचे निश्चित करून लॉकडाऊननंतर काही दिवसातच पुणे गाठले. पुण्यात दिवस-रात्र एमपीएससीचा अभ्यास करून थेट पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. 

अमोल याचे म्हसवडपासून पाच किलोमीटर अंतरावर दिवड हे गाव असून साधारण दीड हजार लोकवस्ती आहे. त्याचे आई-वडील शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन करतात. अमोलच्या मोठ्या भावाचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे, तर बहिणीचे डीएड झाले असून ती विवाहित आहे. आई- वडील अशिक्षित असून तिन्ही मुलांना त्यांनी जिद्दीने शिक्षण दिले.

अमोल घुटुकडे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिवड येथे, तर बारावीचे शिक्षण म्हसवड येथे झाले . अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण बुधगाव (जि. सांगली ) येथील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पूर्ण केले. या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना कॅम्पसमधून मुंबई येथे अमोलला नोकरीची संधी मिळाली. मात्र, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडली आणि नोकरीही गेली. त्यानंतर अमोल याने मुंबईहून थेट गाव गाठले.

मुळातच अभ्यासात हुशार असलेला अमोल याने तेथे गेल्यानंतर एमपीएससीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आपण या परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ असा त्याला आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर त्याने दिवडहून थेट पुणे गाठले. पुणे येथे आल्यानंतर त्यांने एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी क्लास लावले आणि पहिल्या प्रयत्नात त्याने पोलीस उपनिरीक्षकपदास गवसणी घालत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. 

अमोलने महाज्योती संस्थेचे देखील विशेष आभार मानले आहेत. महाज्योती योजनेचा एक वर्षासाठी अर्थसहाय्याचा फायदा झाला असून त्याचा त्याला विशेष लाभ झाल्याचे अमोलने आवर्जून सांगितले.  राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास (एसबीसी) प्रर्वगातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या मूल्याधिष्ठित प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळाच्या जोरावर आज एमपीएससीचे तब्बल ११० प्रशिक्षणार्थी हे पीएसआयच्या अंतिम यादीच्या मेरीट मध्ये आले आहेत.