TET EXAM: न्यायालयाच्या निकालावर पुनर्विचार याचिका; ॲड. राहुल कदम यांची माहिती

ॲड. कदम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काहीही करता येणार नाही. मात्र, शेवटचा एक अशेचा किरण म्हणून आपण पुनर्विचारयाचिका दाखल करू शकतो. या याचिकेद्वारे २०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून वगळण्यात यावे अशी, मागणी करण्यात येणार आहे. मात्र, निकाल काय येईल हे सांगता येणार नाही त्यामुळे शिक्षकांनी गाफील न राहता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

TET EXAM: न्यायालयाच्या निकालावर पुनर्विचार याचिका; ॲड. राहुल कदम यांची माहिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court Decision) एका निकालामुळे राज्यभरातील लाखो शिक्षकांची झोप उडाली आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक खाजगी शाळेतील शिक्षकांना (Primary and secondary private school teachers) नोकरी टिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिर्वाह (Passing the TET exam has been made mandatory) करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल समजून घेण्यासाठी पुण्यात महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे दिग्गज वकील, ॲड. राहुल कदम (Adv. Rahul Kadam) यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल समजावून सांगितला. 

B.Pharmacy Admission : फार्मसीचे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; २९ सप्टेंबरला पहिली यादी

मंगळवार दि. २३  सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने नुकताच मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या TET बाबतच्या निकालाबाबत चर्चासत्राचे आयोजन RCM गुजराथी शाळा, पुणे येथे करण्यात आले. या प्रसंगी  शिक्षकांना नेहमीच मदत आणि मार्गदर्शन करणारे, त्यांना न्याय मिळवून देणारे अभ्यासू व निष्णात, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील, ॲड. कदम यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल समजावून सांगितला. 

अॅड. कदम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काहीही करता येणार नाही. मात्र, शेवटचा एक अशेचा किरण म्हणून आपण पुनर्विचार याचिका दाखल करू शकतो. या याचिकेद्वारे २०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून वगळण्यात यावे अशी, मागणी करण्यात येणार आहे. मात्र, निकाल काय येईल हे सांगता येणार नाही त्यामुळे शिक्षकांनी गाफील न राहता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. 

TET बाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयांनी निकालातील निरीक्षणे अॅड. कदम यांनी समजावून सांगितली. तसेच सर्व शिक्षकांनी त्यांना आपल्या मनात असलेले टीईटी बाबतचे प्रश्न आणि शंका विचारल्या त्याबाबतही कदम साहेबांनी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष नारायण शिंदे, जिल्हा सचिव जितेंद्र पायगुडे, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, राज्य सहसचिव विकास थिटे, पुणे शहराध्यक्ष संदीप सातपुते यांच्यासह इतर पदाधिकारी व महासंघाचे पदाधिकारी व सभासद यांचीही उपस्थिती लाभली.