राज्यात ३ लाख विद्यार्थ्यांनी घेतला अकरावीत प्रवेश; पहिली फेरी सुरू
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावी प्रत्यक्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात आत्तापर्यंत एकूण ३ लाख २ हजार ६१ एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यापैकी दोन लाख ३१ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी 'कॅप' अंतर्गत प्रवेश केला असून, ७० हजार ६०५ विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत प्रवेश घेतले आहेत, अशी माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अकरावी प्रवेश प्रक्रियेला (11th admission process) आता वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मागील महिना-दीड महिन्यापासून प्रतीक्षेत असलेले पालक आणि विद्यार्थी प्रवेशासाठी धावपळ करत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) अकरावी प्रत्यक्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात आत्तापर्यंत एकूण ३ लाख २ हजार ६१ एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित (3 lakh 2 thousand 61 students have secured admission) केले आहेत. यापैकी दोन लाख ३१ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी 'कॅप' अंतर्गत प्रवेश केला असून, ७० हजार ६०५ विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत प्रवेश घेतले आहेत, अशी माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
वर्षभरात किती झाडे लावली, शिक्षण संस्थांना अहवाल सादर करण्याचे निर्देश
राज्यात ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांच्या १९ हजार ३२४ शाखा आहेत. यात २९ शाखांना १०० टक्के विद्यार्थी, तर २ हजार ४८९ शाखांना प्रवेश क्षमतेच्या ८० ते ९९ टक्के विद्यार्थी अलॉटमेंट झाले. १ हजार ८८८ शाखांना प्रवेश क्षमतेच्या ६० ते ७९ टक्के, ३ हजार ५०५ शाखांना प्रवेश क्षमतेच्या ४० ते ५९ टक्के, तर १० हजार २७८ शाखांना प्रवेश क्षमतेच्या १ ते ३९ टक्के विद्यार्थी अलॉटमेंट झाले.
कनिष्ठ महाविद्यालयांच्या ९ हजार २० शाखांमध्ये त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश अर्ज आलेले आहेत. उर्वरित १० हजार ३०४ शाखांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आलेले आहेत. २ जुलैपर्यंत नियमित फेरी एक मध्ये विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये कॅप फेरीसाठी एकूण २ लाख ३१ हजार ४५६ इतके प्रवेश झालेले आहेत. तसेच कोटामध्ये (व्यवस्थापन कोटा, संस्थाअंतर्गत कोटा, अल्पसंख्यांक कोटा) ७० हजार ६०५ इतके प्रवेश झालेले आहेत. आजपर्यंत एकूण प्रवेश ३ लाख २ हजार ६१ इतके झालेले आहेत.
