शाळेच्या निकालावरून ९ वर्षांच्या मुलीची जन्मदात्याने केली क्रूर हत्या

अनामिकाने भावाच्या गुणपत्रिकेवर काही खाडाखोड केली होती. या किरकोळ गोष्टीचा राग अनावर झालेल्या वडिलाने घरातील लाकूड कटर मशीन सुरू करून मुलीच्या गळ्यावर, डोक्यावर, गालावर आणि पाठीवर वार केले. जखमांमुळे अनामिकाचा जागीच मृत्यू झाला.

शाळेच्या निकालावरून ९ वर्षांच्या मुलीची जन्मदात्याने केली क्रूर हत्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दौंड तालुक्यातील देऊळगाव येथील (Daund Crime News) हनुमान वस्ती परिसरातून धक्कादायक घटना समरो आली आहे. शाळेच्या गुणपत्रिकेवरील (School Report Card) किरकोळ खाडाखोडीच्या रागातून वडिलांनीच आपल्या ९ वर्षीय मुलीची लाकूड कापण्याच्या मशीनने निर्घृण हत्या (Murder of Student) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना केवळ एक वैयक्तिक अपराध नसून, आजच्या स्पर्धात्मक शिक्षण व्यवस्थेतील अतिरेकी अपेक्षा, पालकांच्या अस्वास्थ्यकर दबाव आणि बालमानसिक आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाचे भयावह उदाहरण ठरली आहे. अनामिका चव्हाण (वय ९ वर्षे) असे मृत मुलीचे नाव असे आहे. आरोपी शांताराम चव्हाण (वय ३३ वर्षे) हा तिचा वडील आहे. ती इयत्ता चौथीच्या (4th Class Students) वर्गात शिक्षण घेत होती. 

प्राथमिक तपासानुसार, अनामिका आणि तिचा भाऊ संस्कार (वय १०) यांचे शाळेचे निकाल लागले होते. अनामिकाने भावाच्या गुणपत्रिकेवर काही खाडाखोड केली होती. या किरकोळ गोष्टीचा राग अनावर झालेल्या वडिलाने घरातील लाकूड कटर मशीन सुरू करून मुलीच्या गळ्यावर, डोक्यावर, गालावर आणि पाठीवर वार केले. जखमांमुळे अनामिकाचा जागीच मृत्यू झाला. नंतर आरोपीने मुलीचा देह साडीत गुंडाळून पुरावा नष्ट करण्यासाठी राहत्या घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या सूचनेनुसार दौंड पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपीला अटक केली. पुरावा लपवण्यास मदत केल्याप्रकरणी शांतारामसोबत राहणाऱ्या चिंगु शिंदबाद भोसले या महिलेलाही अटक करण्यात आली आहे. 

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले की, खुन, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.ही घटना शिक्षण क्षेत्रासाठी गंभीर चेतावणी आहे. आज अनेक पालक आपल्या मुलांकडून अपेक्षा करतात की, शून्य चुका, नेहमी प्रथम श्रेणी किंवा उच्च गुण. लहान मुलांना चुका करण्याचा नैसर्गिक अधिकार असतो, परंतु काही पालकांसाठी ही चूक अपराध बनते. स्पर्धात्मक परीक्षांचा दबाव, सामाजिक तुलना आणि यश हेच एकमेव ध्येय या मानसिकतेमुळे बालकांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. 

शिक्षणतज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांच्या चुका समजून घेण्याची, त्यांना मार्गदर्शन करण्याची आणि भावनिक आधार देण्याची गरज आहे. शाळांमध्येही पालकांसाठी पेरेंटिंग वर्कशॉप्स आणि बालमानसिक आरोग्य कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे.अनामिकासारख्या घटनांमुळे संपूर्ण समाजाने विचार करावा. शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे, तर चांगले मानवी मूल्ये घडवणे आहे. पालक, शिक्षक आणि समाजाने मिळून बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि दबावमुक्त वातावरण देण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.