केवळ 'त्या' २० दिवसांमुळे भावी शिक्षकांचे मोठं नुकसान

या वर्षी डी.एड, बी. एड आणि एम. एड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना केवळ २० दिवसांमुळे या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. 

केवळ 'त्या' २० दिवसांमुळे भावी शिक्षकांचे मोठं नुकसान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सध्या शिक्षक अभियोग्यता चाचणी (TAIT) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Examination Council) या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत १० मे पर्यंत देण्यात आली आहे. मात्र, या वर्षी डी.एड, बी. एड आणि एम. एड (D.Ed, B. Ed and M. Ed students) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना केवळ २० दिवसांमुळे या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. 

बी. एड च्या अंतिम सत्राचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या  आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात 'टेट' साठी अर्ज करण्यासाठी १० मे शेवटची तारीख देण्यात आली आहे.  तर बीएड, डीएड व एमएडचा निकाल येईपर्यंत या विद्यार्थ्यांना 'टेट'ला बसता येणार नाही. तेव्हा केवळ 15 ते 20 दिवसांचा कालावधी या भावी शिक्षकांना भोवण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 'टेट' ला बसण्याची परवानगी देण्यात यावी, अथवा ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. 

डी. एड, बीएड व एमएड चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक आहे. दरम्यान, शासनाकडून यंदाच्या सत्रात ही परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी १० मे रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे. मात्र, यंदाच्या सत्रात अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल हा १० मे नंतर म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी 'टेट'ला बसण्यापासून अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आह