11th Admission : अकरावीच्या अंतिम फेरीचे वेळापत्रक जाहीर

शैक्षणिक सत्र २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या आत्तापर्यंत १० फेऱ्या राबविण्यात आलेल्या आहेत. राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे

11th Admission : अकरावीच्या अंतिम फेरीचे वेळापत्रक जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अकरावी प्रवेशासाठी (11th admission process) विशेष अंतिम फेरीचे वेळापत्रक (Special finals schedule announced) निश्चित करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आणखीन एक संधी (Extension of time for admission) प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांनी ३ ते ७ आक्टोबर या कालावधीत नोंदणी करणे व कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे, अपेक्षित असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर (Mahesh Palkar) यांनी सांगितले.

TET परीक्षा अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ; अतिवृष्टीमुळे संधी

शैक्षणिक सत्र २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या आत्तापर्यंत १० फेऱ्या राबविण्यात आलेल्या आहेत. राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सदर ११ व्या अंतिम विशेष फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. हाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.

अकरावी प्रवेशासाठी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते ६ ऑक्टोबर २०२५ दुपारी ३ पर्यंत विद्यार्थी नवीन नोंदणी, प्राधान्यक्रम भरणे, प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे. या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची व नोंदणीची सुविधा अंतिमतः देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या फेरीमध्ये विकल्प भरले आहेत त्यांच्या प्राधान्यक्रम / विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास केवळ अशा विद्यार्थ्यांना पुनश्च रिक्त जागा दर्शवून रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन विकल्पात बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणनुक्रमे देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी विकल्प नोंदविला नाही त्यांना त्या स्तरावर गुणानुक्रमे महाविद्यालयाची अलॉटमेंट करण्यात येणार नाही. त्यानंतर गुणानुक्रमे कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना पुनश्च विकल्प नोंदविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणनुक्रमे देण्यात येईल, असे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कनिष्ठ महाविद्यालय अलॉटहोणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक अलॉटमेंट नंतर विकल्प बदलण्याची सुविधा शेवटच्या विद्यार्थ्यांस महाविद्यालय अलॉटमेंट होईपर्यंत देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंटच्या टप्प्यावर महाविद्यालयाची अलॉटमेंट झाल्यास त्यांना पुनश्च विकल्प भरता येणार नाही. तसेच विकल्प बदलावयाची वेळी एसएमएस/संकेतस्थळावर देण्यात येईल. प्रत्येक स्तरावर विकल्प न बदलल्यास विद्यार्थ्यास प्रवेश घेयचा नाही असे समजून प्रवेश प्रक्रियेतील त्या टप्प्यावर विद्यार्थ्याचा विचार प्रवेशाकरीता केला जाणार नाही. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची अलॉटमेंट करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन ७ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश करणे आवश्यक असेल.