इतिहास घडणार! एकाच दिवशी अनुकंपाच्या १० हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान होणार..
अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल. शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण कधी तांत्रिक कारणाने, तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडल्या होत्या.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लागण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात (In the final stage of the process) आली आहे. आज शनिवार दि. ४ ऑक्टोबर रोजी राज्यातील ५ हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना (Compassionate candidate) शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार (Appointment letters will be provided) आहेत. याचवेळी ५ हजार १२२ एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून, एकाच दिवशी एकूण १० हजार ३०९ उमेदवार (Appointment letters to 10,309 candidates) शासकीय नोकरीत दाखल होतील.
11th Admission : अकरावीच्या अंतिम फेरीचे वेळापत्रक जाहीर
अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल. शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण कधी तांत्रिक कारणाने, तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडल्या होत्या.
संबंधीतांची दीर्घ प्रतिक्षा लक्षात घेऊन या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ५ हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.
शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय कारणाने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. सरकारने सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील 5 हजार 187 अनुकंपा उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपांचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे.