11th Admission : दुसऱ्या फेरीसाठी १.३८ लाख नवीन नोंदणी, १७ जुलै रोजी निवड यादी

राज्यातील ९ हजार ४६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख ३२ हजार ९६० जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये ७५ हजार ८०९ राखीव कोट्यातून, तर ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थी पहिल्या फेरीद्वारे प्रवेश घेतलेले आहेत.

11th Admission : दुसऱ्या फेरीसाठी १.३८ लाख नवीन नोंदणी, १७ जुलै रोजी निवड यादी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील अकरावीच्या केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील (11th admission process) दुसऱ्या फेरीची मुदत संपल्यानंतर नवीन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीसाठी १ लाख ३८ हजार १०१ विद्यार्थ्यांनी नव्याने नोंदणी (1 lakh 38 thousand 101 students registered for the new) केली आहे. तसेच ५ लाख ५३ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरला आहे. तसेच १७ जुलै रोजी प्रवेशाची निवड यादी प्रसिद्ध (Selection list released on July 17) करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर (Dr. Mahesh Palkar) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा ताम्हिणी घाटात अपघाती मृत्यू

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या फेरीची निवड यादी १७ जुलै रोजी जाहीर होणार आहे. तसेच या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलै या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. राज्यातील ९ हजार ४६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख ३२ हजार ९६० जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये ७५ हजार ८०९ राखीव कोट्यातून, तर ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थी पहिल्या फेरीद्वारे प्रवेश घेतलेले आहेत.

संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, अजूनही १६ लाख २४ हजार ८६४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीतील तांत्रिक अडचणी आणि अपेक्षित प्रवेशाचा प्रतिसाद पाहता, आता दुसऱ्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उर्वरित लाखो विद्यार्थ्यांसाठी ही फेरी निर्णायक ठरणार आहे.