राष्ट्रीय परीक्षांना डार्कनेटपासून सुरक्षित ठेवण्यासाठी 'फुलप्रुफ प्लॅन' तयार 

माजी इस्रो प्रमुख डॉ. राधाकृष्णन समितीच्या अहवालाच्या आधारे, केंद्राने २०२५ च्या परीक्षांमध्ये माजी सैनिकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच गृह मंत्राल इलेक्ट्रॉय, इलेक्ट्रॉनिक्स मंत्राल आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या तज्ञांचा सहकार्याने   परीक्षा प्रक्रियेला  डार्कनेटपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष योजना आखली आहे.

राष्ट्रीय परीक्षांना डार्कनेटपासून सुरक्षित ठेवण्यासाठी 'फुलप्रुफ प्लॅन' तयार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मागच्या वर्षी डार्कनेट आणि टेलिग्रामच्या माध्यमातून नीटसारख्या (Neet) परीक्षांचे पेपर लिक झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षांची अखंडता राखण्यासाठी काही महत्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Some important measures have been taken to maintain the integrity of national examinations) केंद्रासोबतच IIT कानपुर या संस्थेवर याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.  
मीडिया रिपोर्टनुसार, माजी इस्रो प्रमुख डॉ. राधाकृष्णन समितीच्या अहवालाच्या आधारे, केंद्राने २०२५ च्या परीक्षांमध्ये माजी सैनिकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. (The Centre has appointed ex-servicemen as supervisors in the 2025 exams) तसेच गृह मंत्राल इलेक्ट्रॉय, इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या तज्ञांचा सहकार्याने परीक्षा प्रक्रियेला डार्कनेटपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष योजना आखली आहे. 

समितीच्या अहवालाच्या आधारे, सरकारने राष्ट्रीय चाचणी संस्थेमध्ये ऑडिटिंग आणि पडताळणी उपायांची एक नवीन यंत्रणा विकसित केली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांसह आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्यासह दोन बैठका झाल्या आहेत. याशिवाय, एनटीए परीक्षा प्रक्रियेवर सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या गटांमध्ये बैठका घेत आहे. 

समितीच्या अहवालातील मुख्य शिफारशीनुसार, परीक्षा केवळ संबंधित राज्यांनी आणि त्यांच्या जिल्हाधिकार्‍यांनी सूचित  केलेल्या परीक्षा केंद्रांवरच घेतली जाईल. त्या परीक्षा केंद्रांची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांवर निश्चित करण्यात आली आहे. केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय आणि केंद्रीय विद्यालय शाळांच्या मुख्याध्यापकांनाही जिल्हाधिकाऱ्यांच्या टीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

परीक्षांमधील अनियमितता रोखण्याची जबाबदारी आता मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत, ज्या शाळेत परीक्षा केंद्र उभारले गेले होते त्या शाळेतील वरिष्ठ शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम पहात होते. आता NTA द्वारे निवडलेले माजी सैनिक आणि माजी केंद्रीय वरिष्ठ अधिकारी पर्यवेक्षक म्हणून परीक्षा केंद्राचे निरीक्षण करतील.