विद्या व्हॅली स्कूलने RTE च्या विद्यार्थ्यांचा नाकारला नववीचा प्रवेश; पालकांचे शाळेसमोर धरणे आंदोलन

आरटीई अंतर्गत विद्या व्हॅली स्कूलमध्ये विनोद जाधव यांचा मुलगा अथर्व विनोद जाधव याने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण याच शाळेत पूर्ण केले. मात्र, इयत्ता नववीसाठी शाळेने अथर्वचा प्रवेश मनमानी पद्धतीने नाकारला. शाळेने अथर्वला वर्गात बसू न देता त्याला शाळा सोडल्याचा दाखला जबरदस्तीने दिला.

विद्या व्हॅली स्कूलने RTE च्या विद्यार्थ्यांचा नाकारला नववीचा प्रवेश; पालकांचे शाळेसमोर धरणे आंदोलन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील मुळशी तालुक्यातील सुसगाव येथील विद्या व्हॅली स्कूलने (Vidya Valley School in Susgaon)आरटीई अंतर्गत इयत्ता पाहिलीपासून आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा इयत्ता नववीतील प्रवेश नाकारला (Denied admission to ninth)असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालक शाळेचे नियमित शुल्क भरण्यास तयार (Ready to pay regular school fees)असताना शाळा प्रशासन प्रवेश नाकारत आहे.त्यामुळे शाळा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेत असून त्याचे शैक्षणिक नुकसान करत आहेत,असा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केला जात आहे. दरम्यान, संबंधित शाळेला विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारता येणार नाही.त्याला नियमानुसार प्रवेश द्यावा लागेल,असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक गणपत मोरे (Pune Divisional Education Deputy Director Ganpat More)यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले. 

आरटीई अंतर्गत विद्या व्हॅली स्कूलमध्ये विनोद जाधव यांचा मुलगा अथर्व विनोद जाधव याने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण याच शाळेत पूर्ण केले. मात्र, इयत्ता नववीसाठी शाळेने अथर्वचा प्रवेश मनमानी पद्धतीने नाकारला. शाळेने अथर्वला वर्गात बसू न देता त्याला शाळा सोडल्याचा दाखला जबरदस्तीने दिला. तसेच दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा,असे सांगितले.परंतु, पालक शुल्क भरण्यास तयार असले तरी पालकांनी एक रकम्मी एक लाख 62 हजार रुपये एवढे शुल्क एकाचवेळी भरावे,असा आग्रह शाळा प्रशासनाने धरला. पालकांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे टप्पा टप्प्याने शुल्क जमा करण्याची सवलत दिली नाही.त्यामुळे पालकांनी शाळेसमोर धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे. शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नसल्याने हा मार्ग स्वीकारला असल्याचे पालक विनोद जाधव यांनी सांगीतले. 

विद्यार्थ्यांचे पालक विनोद जाधव यांचा आरोप आहे की, "शाळा गरीब व RTE अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्या जागेवर श्रीमंत व पैसे भरणाऱ्या पालकांच्या मुलांना प्रवेश देत आहे. त्यामुळे शाळा प्रशासन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर अन्याय करत आहे.

---------------------------------

 एखादा विद्यार्थी आरटीई अंतर्गत इयत्ता पहिली पासून आठवीपर्यंत कोणत्याही शाळेत शिक्षण घेत असेल तर त्याला इयत्ता नववीमध्ये त्याच शाळेत शिक्षण घेण्याच्या अधिकार आहे.पालक शाळेचे शुल्क भरण्यास तयार असतील तर शाळेला संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारता येत नाही.प्रवेश नाकारत असेल तर शाळेला नियमानुसार कार्यवाहिला सामोरे जावे लागेल. 
- गणपत मोर, शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग