अनैसर्गिक जगण्याने ताणतणाव वाढतो - डॉ. सदानंद भोसले

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी केले. त्यांनी सध्याची शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात वाढणारे ताणतणाव यासाठी अशा कार्यशाळांची गरज का आहे यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

अनैसर्गिक जगण्याने ताणतणाव वाढतो - डॉ. सदानंद भोसले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क              

अनैसर्गिक पद्धतीने जगण्यामुळे माणसाचे जीवन ताणतणाव ग्रस्त झाले आहे (Living in an unnatural way makes a person's life stressful) यामधून मुक्त होण्यासाठी माणसाने नैसर्गिक पद्धतीने जगले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले (Director of National Service Scheme Dr. Sadanand Bhosale) यांनी केले आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालय (Abasaheb Garware College) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेत(State-level stress management workshop) ते बोलत होते.

या कार्यशाळेसाठी पुण्यासह नाशिक, अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधील महाविद्यालयांमधून एकूण शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुधीर भोसले होते. त्यांनी कार्यशाळेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी केले. त्यांनी सध्याची शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात वाढणारे ताणतणाव यासाठी अशा कार्यशाळांची गरज का आहे यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यशाळेचे संयोजक म्हणून प्रा.मधुकर वाळुंज, डॉ.शितल शेवते, प्रा.विशाल लांडगे, प्रा.अपूर्वा पवार, डॉ.जया लिंबोरे, प्रा.शंकर घाडगे, डॉ.एकनाथ सावळे या सर्वांनी काम पाहिले. प्रा. किसन कुमरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. कुंडलिक पारधी यांनी करून दिला. तर कार्यक्रमाचे आभार डॉ. अनिल पारधी यांनी मानले.