बारावी झालेल्या तरूणांना थेट जर्मनीत नोकरी, अन् महिना अडीच लाख पगार; शिक्षणमंत्र्यांचा दावा..
एखादा विद्यार्थी तिथे गेला तर वर्षाला 30 लाख रुपये कमवू शकतो. यामुळे आपला जीडीपी कितीतरी पटीने वाढणार आहे, असा दावा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
जागतिक मंदीमध्ये रशिया सारखा देश कोसळला पण भारत जागरूक राहिला. मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे जर्मनी सोबत करार झाला यामध्ये जर्मन भाषा शिकवण्याच्या उपक्रमाला सुरुवात (Start of German language teaching activities) झाली आहे. आठवीपासूनच जर्मन भाषा शिकवण्यात येत आहे. त्यामुळे बारावी झालेल्या मुलगा थेट जर्मनीत नोकरी (Job in Germany for 12th pass youth) लागेल, तिथे अडीच लाख रुपये पगार (Salary two and a half lakh rupees) आहे, त्यामुळे एखादा विद्यार्थी तिथे गेला तर वर्षाला 30 लाख रुपये कमवू शकतो. यामुळे आपला जीडीपी कितीतरी पटीने वाढणार आहे, असा दावा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये कोणते बदल होणे आवश्यक आहे, ज्याने शिक्षणाचा दर्जा उंचावेल सोबतच महाराष्ट्राच भविष्य उज्वल होईल,असा प्रश्न मंत्री केसरकर यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले , महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकांची गुणवत्ता वाढवली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात जेवढे शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर अधिकारी वर्ग यांना फिल्डवर पाठवण्यात आले पाहिजे. प्रत्येक शाळांना वेळोवेळी भेट देणे आवश्यक आहे. आपल्याकडे 2 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांच्या वेळोवेळी चाचणी परीक्षा घेतल्या पाहिजेत, अशा एक ना दोन अनेक बदलांचा पाढा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षणातील बदलावर विचारलेल्या प्रश्नावर वाचला.
विद्यार्थ्यी कुठल्या विषयामध्ये कमी आहेत त्या विषयावर लक्ष द्यावे लागेल. मुलांना कवायतीची सवय लागली पाहीजे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी वाढती पाहिजे. त्याचबरोबर कृषी हा विषय आम्ही अनिवार्य केले आहे. एग्रीकल्चर कॉलेजमध्ये मुले सध्या जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असे त्यांनी मान्य केले.