वार्षिक परीक्षेसंदर्भात शिक्षक संघटनांच्या समस्या, शिक्षण विभागाकडून मार्ग काढण्याचे आश्वासन
वेळापत्रकाबद्दल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर शिक्षकांनी मांडलेल्या समस्यांच्या खोलात जाऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना करून त्यातून योग्य तो मार्ग काढला जाईल, असे आश्वासन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी दिले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा (Annual examinations for classes 1 to 9), संकलित चाचणी २ यासाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकाबद्दल (Timetable released) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाकडून (State Secondary and Higher Secondary Principal Association Corporation) नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर शिक्षकांनी मांडलेल्या समस्यांच्या खोलात जाऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना करून त्यातून योग्य तो मार्ग काढला जाईल, असे आश्वासन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार (Rahul Rekhawar, Director of the Training Council) यांनी दिले. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर (Nandkumar Sagar) यांनी दिली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नुसतेच राज्यातील पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, ८ ते २५ एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी, संकलित चाचणी-२ या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार असल्याने उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करण्यास वेळच मिळणार नसल्याचा मुद्दा शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला. या अनुषंगाने मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, 'एससीईआरटी'चे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली. यावेळी समस्यांच्या अधिक खोलात जाऊन काही उपाययोजना करणे आवश्यक असल्यास त्या केल्या जातील, असे आश्वासन रेखावर यांच्याकडून देण्यात आले आहे.
___________________________________
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, 'एससीईआरटी'चे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांना सांगण्यात आले की, माध्यमिक शाळेत विषयानुसार शिक्षक असतात. एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आणि किमान पाच विषयाचा कार्यभार यानुसार ३५० ते ४०० उत्तरपत्रिका चार ते पाच दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. त्यासाठी शिक्षकांना १० ते १२ दिवसांचा कालावधी निकालाच्या कामाच्या तपासणीसाठी देण्यात यावा. दोन दिवसांत विचार विनिमय करून आपल्याला कळवण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.
नंदकुमार सागर, सचिव, मुख्याध्यापक संघ महामंडळ