शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरण; शिक्षकांचे उपोषण, अजित पवार लक्ष देणार का?
शिक्षक धनंजय नागरगोजे यांना योग्य न्याय व कुटुंबाला हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र सरकारने त्याकडे पाठ फिरवली, असा आरोप यावेळी शिक्षकांनी केला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बीड जिल्ह्यातील (Beed Crime News) शिक्षक धनंजय नागरगोजे (Teacher Dhananjay Nagargoje) यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यांना योग्य न्याय व कुटुंबाला हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून उपोषण सुरू (Hunger strike has been going on for eight days) आहे. मात्र, सरकारने त्याकडे पाठ फिरवली,असा आरोप यावेळी शिक्षकांनी केला. 'आमच्या जीवाचे बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल' असा इशारा देखील शिक्षकांनी दिला आहे.
बीडमधील शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. नागरगोजे यांच्या आत्महत्येमुळे विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बीडमधील विनाअनुदानित शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी सरकारला इशारा दिला आहे. बीडमधील शिक्षकांनी आठ दिवसापासून शिक्षकांचे उपोषण सुरू केले आहे. याच शिक्षकांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.
उपोषणकर्त्या शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
उपोषणकर्त्या शिक्षकांनी मागण्यांमध्ये शिक्षकांना तात्काळ अनुदान देण्यात यावे, त्याचबरोबर धनंजय नागरगोजे यांना न्याय मिळावा व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. याशिवाय धनंजय नागरगोजे यांच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. त्याचबरोबर त्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी; अशी देखील मागणी या शिक्षकांनी केली आहे.
बीडमधील शिक्षक उपोषणाला बसले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या शिक्षकांचे उपोषण सुरू आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर असणार आहेत. बीडमधील उपोषणकर्ते शिक्षक उद्या म्हणजे बुधवारी अजित पवारांची भेट घेणार आहेत. याच शिक्षकांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. शिक्षकांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांकडून काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
आम्ही गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहोत. साधा आम्हाला एक फोन देखील कोणी केला नाही. तसेच प्रशासनातील अधिकारी किंवा शासनाचे प्रतिनिधी कोणीही आम्हाला भेटायला आलेले नाहीत. ही लाजिरवाणी बाब आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. धनंजय नागरगोजे या शिक्षकाने फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली. आम्ही त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी उपोषण करत आहोत, सरकारने याची दखल घ्यावी, असे शिक्षक म्हणाले.