राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना 'सेतू अभ्यासक्रम' बंधनकारक
नव्या धोरणात शालेय शिक्षणाची रचना पायाभूत स्तर (पूर्व प्राथमिक ते दुसरी, वय ३-८), पूर्व माध्यमिक (तिसरी ते पाचवी, वय ८-११), माध्यमिक (सहावी ते आठवी, वय १-१४) उच्च माध्यमिक (नववी ते बारावी, वय १४-१८) अशी करण्यात आली आहे. सेतू अभ्यासक्रम म्हणजे मागील इयत्तेतील महत्वाच्या संकल्पनांवर आधारित अभ्यासक्रम होय.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (National Education Policy 2020) नुसार शालेय स्तरावर नव्याने बदल होताना दिसत आहेत. त्याची अंमलबजावणी राज्यात टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. नव्या धोरणानुसार आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना 'सेतू अभ्यासक्रम' (Setu curriculum implemented) बंधनकारक करण्यात येणार आहे. एनसीईआरटीने (NCERT) तयार केलेली पाठ्यपुस्तके आवश्यक राज्यस्तरीय बदलांसह स्वीकारली जाणार आहेत. याबाबतचा शालेय शिक्षण विभागाकडून यापुर्वीच (School Education Department) शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नव्या धोरणात शालेय शिक्षणाची रचना पायाभूत स्तर (पूर्व प्राथमिक ते दुसरी, वय ३-८), पूर्व माध्यमिक (तिसरी ते पाचवी, वय ८-११), माध्यमिक (सहावी ते आठवी, वय १-१४) उच्च माध्यमिक (नववी ते बारावी, वय १४-१८) अशी करण्यात आली आहे. सेतू अभ्यासक्रम म्हणजे मागील इयत्तेतील महत्वाच्या संकल्पनांवर आधारित अभ्यासक्रम होय. त्यासाठी राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदे (एससीईआरटी) मार्फत तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे, २०२८-२९ पूर्वीच या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एससीईआरटी राज्याच्या शैक्षणिक गरजांनुसार पाठ्यक्रम तयार करत असून, नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीपूर्वी सेतू अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. पाठ्यपुस्तक तयार करताना विषयतज्ज्ञ व विभागप्रमुखांचा समावेश असणार आहे. हे सर्व पाठ्यपुस्तके अध्ययन निष्कर्षाची पूर्तता करणारी असावीत आणि त्यांची 3 पडताळणी एससीईआरटी करणार आहे. अंतिम मंजुरी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समिती देणार असून, त्यानंतरच त्यांची अंमलबजावणी होणार आहे. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.