विद्यापीठाच्या परीक्षा पुढे जाण्याची शक्यता?
परीक्षा विभागातील कॉर्डिनेशन सेक्शन मधील 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कोविडनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)सर्व परीक्षा नियोजित कालावधीमध्ये घेण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या (Transfers of staff in examination department)झाल्यामुळे परीक्षा विभागाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बदल्यांना स्थगिती द्यावी यासाठी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी प्रभारी कुलसचिव (Registrar)यांची भेट घेतली. मात्र या बदल्यांना स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे परीक्षा नियोजनात अडचणी निर्माण झाल्यास त्यास विद्यापीठ प्रशासन (University Administration)जबाबदार असेल, असे लेखी पत्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रशासनाला दिले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागासह शैक्षणिक प्रवेश विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.पदोन्नती नुसार या बदल्या कराव्या लागल्या आहेत.सुमारे तीन महिन्यांपूर्वी बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आता संबंधित कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कार्यालयात पाठविण्यात आले आहे. परंतु, परीक्षा विभागातील कॉर्डिनेशन सेक्शन मधील 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. या ठिकाणी सर्व नवीन कर्मचारी आले आहेत. त्यांना परीक्षा नियोजन करण्यासंदर्भातील कोणताही अनुभव नाही. त्यामुळे परीक्षा पुढे जाऊ शकतात, अशी भीती परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
विद्यापीठाच्या विविध विभागातील उपकुलसचिव यांनी प्रभारी कुलसचिव डॉ.ज्योती भाकरे यांची भेट घेऊन बदल्यांना स्थगिती द्यावी, अशी विनंती केली होती. परंतु, माजी कुलसचिव यांनी घेतलेल्या निर्णयात कोणतेही बदल करणार नसल्याचे भाकरे यांनी सांगितले. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊनच परीक्षेचे नियोजन करावे लागणार आहे. त्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, यास विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी दुजारा दिला आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठांनी नियोजित वेळेत परीक्षा घेऊन कर्जदार करावेत अशा स्पष्ट सूचना यापूर्वी सर्व कुलगुरूंना राज्यपाल कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेच्या नियोजनाबाबत आणि निकाल जाहीर करण्याबाबत विद्यापीठांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे जाऊ नये म्हणून विद्यापीठ प्रशासन कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत काय निर्णय घेणार? हे पहा चुकीचे ठरणार आहे.