मुख्यमंत्री माझी शाळा... अभियान टप्पा २ ला सुरूवात.. 

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २’या अभियानात  ४ ऑगस्टपर्यंत  सहभागी होता येणार आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा... अभियान टप्पा २ ला सुरूवात.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य शासनाने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा २'  (Mukhyamantri Mazi Shala, Sundar Shala Abhiyan Phase 2)हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानाची सुरूवात (The start of the campaign)येत्या ५ ऑगस्टपासून  होणार असून शेवट  ४ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे.मूल्यांकनाची प्रक्रिया ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पार पाडण्यात येणार आहेत.राज्यातील सर्व शाळांनी (All schools in the state)या अभियानात सहभागी व्हावे आणि पारितोषीके  मिळवावीत,असे आवाहन शिक्षण विभागातर्फे (Department of Education)करण्यात आले आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अनोखे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले होते.आता या अभियानाचा दूसरा टप्पा सुरू केला जात आहे.राज्यातील सर्व स्तरावरील  सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २’या अभियानात  ४ ऑगस्टपर्यंत  सहभागी होता येणार आहे. शाळांना तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावरील विविध प्रकारांमध्ये भरघोस  पारितोषिके मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.यासाठी शाळांनी सरल प्रणालीतील स्कूल संकेतस्थळावर 'एचएम लॉगिन'वरुन दिलेल्या टॅबद्वारे शाळेची  https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4  या संकेतस्थळावर माहिती भरुन पाठवावी लागणार आहे. 

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी  घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका व वर्ग 'अ' व वर्ग 'ब' च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना  पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख व तिसरे पारितोषिक ११ लाख रूपयांचे असेल. उर्वरित महाराष्ट्रात ३५८ तालुक्यात पहिले ३ लाख, दुसरे २ लाख,  तिसरे १ लाख, राज्यातील ३६ जिल्ह्यात पहिले ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख तर ८ विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख, तिसरे ११ लाख रूपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहे.उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना तालुकास्तरावर पहिले ३ लाख, दुसरे २ लाख, तिसरे १ लाख, जिल्हास्तरीय पहिले ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख, विभागस्तरीय पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख, तिसरे ११ लाख तर राज्यस्तरिय  शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पहिले ५१ लाख, दुसरे ३१ लाख व तिसरे २१ लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येईल. 
--------------------------------------------------------
वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम सुरू असताना त्या सर्वांना एका धाग्यात बांधणारा व शिक्षण विभागांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे. यामध्ये सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध उपक्रम राबवून हेतू साध्य करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. भौतिक गोष्टींमध्ये सुधारणा करीत असतानाच शाळेचे विद्यार्थी विषयक व गुणवत्ता विषयक कामकाजसुद्धा मोजमापाच्या परिघांमध्ये आणण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोलाचे योगदान या अभियानातून दिले जात आहे. हे अभियान आता शिक्षण विभागाच्या वार्षिक कामकाजाचा नियमित भाग झालेले आहे. 
- सुरज मांढरे, शिक्षण आयुक्त, महाराष्ट राज्य
-----------------------------------------