महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत मोठी दुर्घटना, मुख्यमंत्री फडणवीसांचे तमिळनाडू सरकारला आवाहन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे माहिती देताना त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच त्यांनी तामिळनाडू सरकारशी तात्काळ संपर्क साधला. बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध आणि बचाव कार्य जलद करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तामिळनाडू प्रशासनाला केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा एक गट चेन्नईच्या पिकनिक ट्रिपला (Picnic trips to Chennai) गेला होता. मात्र, चेन्नईच्या गोल्डन बीचवर घडलेल्या हृदयद्रावक घटनेत महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू (Student drowns to death) झाला आणि दुसरा विद्यार्थी अजूनही बेपत्ता (A student is missing) आहे. या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध आणि बचाव कार्य जलद करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन तामिळनाडू प्रशासनाला (Appeal to Tamil Nadu administration) केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या विविध भागातील 26 विद्यार्थ्यांचा एक गट तामिळनाडूची राजधानी चेन्नईला सहलीला गेला होता. शनिवारी हा गट समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी पोहोचला. अधिकाऱ्यांच्या मते, या गटातील फक्त तीन विद्यार्थी समुद्रात उतरले तेव्हा एका शक्तिशाली लाटेनं त्यांना वाहून नेलं. भंडारा जिल्ह्यातील रहिवासी मयुरी चौधरी या अपघातात दुर्दैवीपणे बुडाली.
अपघात होताच, स्थानिक बचाव कार्य सुरु करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गटातील एक विद्यार्थी राज केदारी हिला सुखरुप वाचवण्यात आले आहे. मात्र, जय पाटील या विद्यार्थ्याचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही आणि सघन शोध मोहीम सुरु आहे. जय पाटीलचे कुटुंब चेन्नईला पोहोचलं आहे, तर मयुरी चौधरीचे नातेवाईकही चेन्नई आणि नागपूरला रवाना झाले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे माहिती देताना त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच त्यांनी तामिळनाडू सरकारशी तात्काळ संपर्क साधला. बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध आणि बचाव कार्य जलद करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तामिळनाडू प्रशासनाला केले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, फडणवीस वैयक्तिकरित्या मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत आणि महाराष्ट्र राज्य प्रशासन पीडित कुटुंबांच्या सतत संपर्कात आहे. मयुरी चौधरी यांच्या निधनाबद्दल फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आणि तिच्या कुटुंबियांना सांत्वन दिलं. सध्या हे विद्यार्थी कोणत्या विशिष्ट शैक्षणिक संस्थेशी संबंधित होतं हे स्पष्ट झालेले नाही, परंतु प्रशासन सर्व आवश्यक माहिती गोळा करण्यात आणि पीडित कुटुंबांना मदत करण्यात व्यस्त आहे.