दोन दिवसात विद्यार्थ्यांना APAAR आयडी द्या ; मुख्याध्यापकांना आदेश 

29 व 30 नोव्हेंबर अपार आयडी दिवस म्हणून साजरे करावेत, अशा सूचना राज्य प्रकल्प संचालक आर विमला यांनी दिल्या आहेत.

दोन दिवसात विद्यार्थ्यांना APAAR आयडी द्या ; मुख्याध्यापकांना आदेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्र शासनाने (Central Govt)प्रत्येक विद्यार्थ्याला 30 नोव्हेंबरपर्यंत अपार आयडी (APAAR ID)उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत, मात्र, 25 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील 65 लाख विद्यार्थ्यांना अपार आयडी (APAAR ID to 65 lakh students)उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 25 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील केवळ 35 टक्के विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे 29 व 30 नोव्हेंबर अपार आयडी दिवस म्हणून साजरे करावेत, अशा सूचना राज्य प्रकल्प संचालक आर विमला (State Project Director R Vimala)यांनी दिल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करत आहेत. केंद्र शासनाकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. 

केंद्र शासनाने दिलेले निर्देश विचारात घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 29 व 30 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्यात यावा, अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आला आहेत. या दोन दिवशी अपार आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात यावी.जिल्हास्तरावरून अपार आयडीबाबत ऑनलाइन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना द्याव्यात. या दोन दिवशी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून अपार आयडी तयार करण्याच्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अपार आयडी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष प्रयत्न करावेत, अशाही सूचना राज्य प्रकल्प संचालक आर विमला यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अपार आय डी, यु-डायस व आधार validation  कामकाज तात्काळ पूर्ण करावे. अनेकदा सूचना दिलेल्या आहेत तथापि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळाच्या बाबतीत फार प्रगती दिसून येत नाही पुढील दोन दिवसात मुख्याध्यापक यांनी व्यक्तिशः लक्ष घालून  याबाबत कार्यवाही करावी, अन्यथा ज्या शाळा प्रतिसाद देणार नाही, त्याच्यावर  कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा स्पष्ट इशारा पुण्यातील शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला आहे.