अकरावी प्रवेशाला ५ दिवस मुदतवाढ द्या; आमदाराची विधानसभेत मागणी

विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, तसेच वेळेचा अपुरा कालावधी यामुळे प्रवेश घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने प्रवेशप्रक्रियेची मुदत वाढवावी आणि पारदर्शकता व सुलभतेसाठी प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन केंद्र सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, इनहाऊस कोटा व मॅनेजमेंट कोट्यातून होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना सवलती देण्यात याव्यात, असे आमदार पिंपळे म्हणाले.

अकरावी प्रवेशाला ५ दिवस मुदतवाढ द्या; आमदाराची विधानसभेत मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

गेल्या दोन महिन्यांपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेचा (11th admission process) गोंधळ मिटायचे नाव घेताना दिसत नाही. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत (Difficulties in online admission process) विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच मुद्दा आमदार हरीश पिंपळे (MLA Harish Pingle) यांनी विधानसभेत मांडला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी ५ दिवसांची मुदतवाढ (5 days extension for 11th admission) द्यावी, अशी मागणी आमदार पिंपळे त्यांनी विभानसभेत लावून धरली. त्यांच्या या मागणीमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिक्षकांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, एक दिवसात प्रश्न मार्गी लावा: आझाद मैदानावर शरद पवार

विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, तसेच वेळेचा अपुरा कालावधी यामुळे प्रवेश घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने प्रवेशप्रक्रियेची मुदत वाढवावी आणि पारदर्शकता व सुलभतेसाठी प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन केंद्र सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, इनहाऊस कोटा व मॅनेजमेंट कोट्यातून होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना सवलती देण्यात याव्यात, असे आमदार पिंपळे म्हणाले.

आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेची स्पष्ट व कायदेशीर मार्गदर्शिका जारी करावी. नॉन प्रमाणपत्रासाठी क्रिमिनल विद्यार्थ्यांना किमान तीन विद्यार्थ्यांना २४ तास देणारी हेल्पलाइन सेवा सुरू ठेवून ती प्रभावी करण्यात यावी, अशी मागणीही आमदार पिंपळे यांनी केली. अकरावी प्रवेश नियमावली त्वरित जाहीर करावी जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. या मागणीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.