जलसंपदा, जलसंधारण विभागातील भरती रखडल्याने राज्यातील बेरोजगार तरुण रस्त्यावर

जलसंपदा व जलसंधारण विभाग आणि इतर विभागात ४ हजार ६०० पेक्षा अधिक अभियंता पदाच्या भरत्या रखडलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आगामी १५ दिवसांत या जागा भरण्यासंबंधीचे वेळापत्रक नाही आले तर छत्रपती संभाजीनगर येथील 'वाल्मी' संस्थेच्या समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देखील या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

जलसंपदा, जलसंधारण विभागातील भरती रखडल्याने राज्यातील बेरोजगार तरुण रस्त्यावर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदाजलसंधारण विभागातील (Water Resources and Water Conservation Department) जवळपास ४ हजार ६०० पेक्षा अधिक पदांसाठीची भरती प्रक्रिया (Recruitment process for 4 Thousand 600 posts) रखडल्याने राज्यभरातील बेरोजगार तरूण आता रस्त्यावर उतरले आहेत. दोन्ही विभागातील भरती प्रक्रियेसह विविध मागण्यांसाठी 'इंजिनिअर्स असोसिएशन' (Engineers Association) या अभियंता संघटनेच्या वतीने पुण्यासह राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पुढील काळात सरकार आंदोलनाची दखल घेऊन भरती प्रक्रिया राबवणार का? हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

जलसंपदाजलसंधारण विभाग आणि इतर विभागात ४ हजार ६०० पेक्षा अधिक अभियंता पदाच्या भरत्या रखडलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आगामी १५ दिवसांत या जागा भरण्यासंबंधीचे वेळापत्रक नाही आले तर छत्रपती संभाजीनगर येथील 'वाल्मी' संस्थेच्या समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देखील या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
____________________________________

रिक्त जागा न भरल्याने संबंधित खात्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच याखेरीज पात्र उमेदवारांवर देखील अन्याय होत आहे. तरुण अभियंत्यांमधील रोष शासनाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हे तंत्रकुशल मनुष्यबळ असून राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांच्या अंगभूत कार्यक्षमतेचा यथायोग्य वापर करून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि शासनाच्या अखत्यारीतील सर्व खात्यांची रिक्त पदे भरण्यासंबंधीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.

सुप्रिया सुळे, खासदार (बारामती)