विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम : बारावी CBSC पेपर आणि CET परीक्षांचे एकाच दिवशी
4 एप्रिल रोजी असलेला सीबीएसईचा मानसशास्त्राचा पेपर आणि एमएएच-एलएलबी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा एकाच दिवशी नियोजित आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा (Class 12 CBSE Board Exam) पेपर आणि राज्यातील सीईटी परीक्षेची तारीख एकत्र (CET Cell Exam Date) आल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सीईटी सेलने नुसतेच विविध अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र, यामध्ये 4 एप्रिल रोजी असलेला सीबीएसईचा मानसशास्त्राचा पेपर आणि एमएएच-एलएलबी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा एकाच दिवशी नियोजित आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.
१ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षांचे इतिहास, भाषा विषय आणि होम सायन्स आणि मानसशास्त्र या विषयांचे सलग चार दिवस पेपर असणार आहेत. तर 4 एप्रिलला एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा नियोजित आहे. त्याच दिवशी बारावी सीबीएससी बोर्डाच्या सायकॉलॉजीचा पेपर असणार आहे. त्यामुळे सीईटी सेलने १ ते ४ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली आहे.सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन महत्त्वाच्या परीक्षांचा सामना करावा लागणार आहे.
1 ते 3 एप्रिल रोजी बीसीए, बीबीए, बीएमएम, बीएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा या कालावधीत नियोजित आहेत. त्याच वेळी सीबीएसई बोर्डाच्या इतिहास, भाषा आणि होम सायन्स या विषयांचे पेपर आहेत. तर 4 एप्रिल रोजी पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा आहे, तर याच दिवशी सीबीएसई बोर्डाचा सायकॉलॉजी विषयाचा पेपर आहे.
___________________________________
बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षा या दोन्ही महत्त्वाच्या असून, अशा परीक्षेच्या तारखा एकाच दिवशी येणे ही मोठी चुकीची गोष्ट आहे. हा प्रकार ज्या अधिकार्याकडून घडला आहे त्याला निलंबित केले पाहिजे. पुन्हा कोणत्या अधिकाऱ्याकडून एवढी मोठी गफलत होता कामा नये. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सीईटी सेलने वेळापत्रकात बदल करावा आणि परीक्षांमध्ये होणारा गोंधळ टाळावा.
दिलीप सिंह विश्वकर्मा, महापेरेंट्स पालक संघटना