मोबाईल नाही तर;बालभारतीची पुस्तके पाहून मुलांनी जेवण करावे: शिक्षण मंत्री दादा भुसे

सध्याची मुले लहान मुले मोबाईलमधील कार्टून पाहिल्याशिवाय जेवण करत नाहीत,पण मोबाईल नाही तर यापुढे बालभारतीची पुस्तके पाहून मुले जेवण करतील,अशा प्रकारची पुस्तके तयार व्हावीत.

मोबाईल नाही तर;बालभारतीची पुस्तके पाहून मुलांनी जेवण करावे: शिक्षण मंत्री दादा भुसे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्पर्धेच्या युगात आपले विद्यार्थी टिकले पाहिजे. त्याचप्रमाणे 'आपण सोप्याकडून अवघडाकडे' असे अध्ययनाचे सूत्र स्वीकारले असून त्यातून उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षणाचा पाया (Foundation of higher education and vocational education) शाळांमधून कसा घालता येईल, याचा विचार बालभारतीची नवीन  पुस्तके (New books of Balbharti)तयार करताना करावा.तसेच सध्याची मुले लहान मुले मोबाईलमधील कार्टून पाहिल्याशिवाय जेवण करत नाहीत,पण मोबाईल नाही तर यापुढे बालभारतीची पुस्तके पाहून मुले जेवण करतील,अशा प्रकारची पुस्तके तयार व्हावीत,अशी अपेक्षाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (School Education Minister Dada Bhuse)यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीतर्फे आयोजित 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत  पाठ्यपुस्तक निर्मिती उदबोधन कार्यशाळे' च्या उद्घाटन प्रसंगी दादा भुसे शुक्रवारी बोलत होते. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देवल, शिक्षण आयुक्त सचिन्‍द्र प्रताप सिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, योजना विभागाचे संचालक कृष्णकुमार पाटील, बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, सुकानू समितीचे सदस्य श्रीपाद ढेकणे आदी उपस्थित होते.

मोबाईल, दूरचित्रवाणी संच व इतर ई-माध्यमांमध्ये अडकूण पडली आहे. परंतु, आर्टिफिशियल इटेलिजेनटच्या आव्हानाला सामोरे जात असताना आपल्या माती व संस्कृतीपासून नाळ तुटू नये, याची काळजी घ्यावी,असे नमूद करून दादा भुसे म्हणाले, बालभारतीचे माध्यमातून तयार केल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल जीवनात यशस्वी वाटचाल करू शकेल आणि त्यातून राष्ट्रीय विचारांचा चांगला नागरिक घडेल,असा असावा. त्याचप्रमाणे त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह थोर समाजसुधारक, क्रांतीकारक भारतीय संस्कृती, संविधान पर्यावर, परिसर अभ्यास आदी घटकांकडे बारकाईने लक्ष द्यावे. 

दादा भुसे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा समावेश इयत्ता चौथीच्या पुस्तकात केला जात आहे.मात्र, शिवाजी महाराज यांनी लढलेल्या लढाया यांसह शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार, महिलांचा सन्मान, शेतकरी हित, समुद्रात बांधलेले किल्ले, आदी गोष्टींनाही स्थान द्यायला हवे.तसेच मराठी विषय सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये बंधनकारक करण्याबाबत आवश्यक पावले उचलावीत.