अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीमध्ये ८० टक्के वाढ; १० वी, १२वी, पदवीचे विद्यार्थी पात्र

 इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पद‌विका अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेत कमीत कमी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. त्यामार्फत या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वितरित केली जाते.

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीमध्ये ८० टक्के वाढ; १० वी, १२वी, पदवीचे विद्यार्थी पात्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत (Annabhau Sathe Development Corporation) त्यांच्या पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य म्हणून शिष्यवृत्ती (Student Scholarships) देण्यात येतात. मात्र, आता या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आहे. त्यामुळे मातंग समाजातील इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पद‌विका अभियांत्रिकी व वैद्यकीय (10th, 12th, degree and diploma engineering and medical students) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत होणार आहे. 

इयत्ता १०वी साठी पुर्वी १ हजार रुपये दिले जायचे आता ५ हजार रुपये मिळणार आहेत. इयत्ता १२वी साठी पुर्वी १ हजार ५०० रुपये दिले जायचे आता ७ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच पदवी आणि पदविका अभ्यासक्रमसाठी पुर्वी २ हजार रुपये दिले जायचे आता १० हजार रुपये दिले जाणार आहेत. तर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पूर्वी २ हजार ५०० दिले जायचे आता १२ हजार ५०० रुपये मिळणार आहेत, असे महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक विकास कुंतुरकर यांनी सांगितले आहे. 

इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पद‌विका अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेत कमीत कमी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. त्यामार्फत या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वितरित केली जाते. उपलब्ध निधीच्या मर्यादित शिष्यवृत्ती एकदाच प्रोत्साहनपर दिली जात असून, या शिष्यवृत्तीत सरकारने आता वाढ केली आहे. पुढील काही दिवसांत शिष्यवृत्तीसाठी प्रवेश अर्ज दाखल करणे सुरू होणार आहे.

राज्यात मागासवर्गीयांपैकी संख्येने मोठ्या प्रमाणात असलेला मातंग समाज व तत्सम १२ पोटजातींसंदर्भात शिष्यवृत्ती योजना समाजकल्याण विभागाने सुरू केली आहे. मातंग समाजाची सामाजिक, आर्थिक विषमता दूर करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे. त्यांना संविधानिक हक्क मिळणे या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते.

मातंग समाजातील ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळतात अशा विद्यार्थ्यांना वर्षातून एकदाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे जाती प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड जिल्ह्याचा रहिवासी असावा, आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. या शिष्यवृत्तीमुळे मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत मिळते, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते