शेतमजूरी करत भारती साके यांनी मिळवली पीएचडी
भारती थिम्मापा साके यांनी शेतात मजुरी करत असताना चक्क पीएचडी पूर्ण केली आहे. श्री कृष्णदेवराय अनंतपूर विद्यापीठाकडून त्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाची शिखरे सर करता येतात याचाच प्रत्येय शेतमजूरी करणाऱ्या भारती यांनी दिला आहे. भारती थिम्मापा साके (Bharti Thimmappa Sake) यांनी शेतात मजुरी करत असताना चक्क पीएचडी पूर्ण केली आहे. श्री कृष्णदेवराय अनंतपूर विद्यापीठाकडून (Sri Krishnadevarai University Anantapur) त्यांना पीएचडी प्रदान (Awarded PhD) करण्यात आली आहे. शिक्षण घेत असताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला मात्र, त्यांनी हार मानली नाही. आई वडीलांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे लहानपणीच लग्न लावून दिले. आता शिकून काय करायचे आहे असे टोमणे देखील त्यांना सहन करावा लागले मात्र त्यांनी अभ्यास आणि मेहनत करणे सोडले नाही.
भारती या आंध्र प्रदेशातील अनंतपुरम जिल्ह्यातील नागलागुडम गावाच्या रहिवासी आहेत. भारती यांचे वडील दारू प्यायचे, घरची परिस्थिती हलाखीची होती. आम्ही तिन्ही मुलीच झाल्यामुळे माझे वडील आईला रोज मारहाण करायचे. कुटुंब चालवण्यासाठी माझी आई रोजंदारीवर कामाला जायची. मी दहा वर्षाची असल्यापासून आईच्या वडिलांकडे राहायला होते. त्यांनीच मला दहावीपर्यंत शिक्षण दिले.
मला माझ्या वडीलांनी शिकू दिले नाही. पण माझ्या आईच्या वडीलांनी म्हणजे आजोबांनी त्यांना शिकवले.आजोबांच्या प्रयत्नांमुळे मी इथपर्यंत पोहोचले असे भारती सांगतात. माझे आजोबा मला सांगायचे तू शाळा शिकली नाहीस तर तुला आईप्रमाणे रोजंदारीवर कामाला जावे लागले. त्यांनी मला शिकायला प्रोत्साहन दिले. मी रोज कामाला जायचे आणि मिळालेल्या वेळेत अभ्यास देखील करत होते. भारती यांचे वडील शिवाप्रसाद यांनी देखील त्यांना शिक्षणासाठी पाठबळ दिले असल्याचे भारती यांनी सांगितले.