बॅकबेंचर व्यवस्था बंद, शाळांनी विद्यार्थी बसण्याची पद्धत बदलली

'स्थानार्थी श्रीकुट्टन' चित्रपटाचे दिग्दर्शक विनेश विश्वनाथन यांनी सांगितले की, पंजाबमधील एका शाळेनेही ही कल्पना स्वीकारली आहे. मला आनंद आहे की याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.

बॅकबेंचर व्यवस्था बंद, शाळांनी विद्यार्थी बसण्याची पद्धत बदलली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेत बहुदा हुशार मुले शिक्षकांच्या समोर पुढच्या बेंचवर बसतात आणि ज्या मुलांना मस्ती करायची असते, शिक्षणात फारसा रस नसतो ती मुले बॅकबेंचर (Backbencher arrangement) असतात असे म्हटले जाते. पण या विचारसरणीला छेद देणारी एक हटके कल्पना समोर आली आहे. केरळमधील शाळांनी (Kerala School) विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन व्यवस्था केलअसून, यात आता कोणताही विद्यार्थी 'बॅकबेंचर' राहणार नाही. या व्यवस्थेमुळे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे लक्ष राहणार (Teachers will pay attention to students) आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढ (Increase in student intelligence) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील वालकोम येथील आरव्हीएचएसएस हे त्यांच्या वर्ग बसण्याच्या व्यवस्थेसह नवोपक्रमाचे एक मॉडेल म्हणून समोर आले आहे. वर्गात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे समान लक्ष देता यावे यासाठी बसण्याची व्यवस्था बदलण्यात आली असून, यात कोणीही 'बॅकबेंचर' नाही. प्रथम ही संकल्पना एका चित्रपटात मांडल्यात आली होती. त्यानंतर शाळांनी स्थानार्थी श्रीकुट्टन या चित्रपटापासून प्रेरित होऊन विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे.

CET Exam : चुका टाळण्यासाठी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

यामध्ये शाळेतील मुले बॅकबेंचर नसतील अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सहज पोहोचता येते, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांकडे सहज पाहता येते आणि विद्यार्थीदेखील त्यांच्या शिक्षकांना सहजपणे पाहू शकतात. केरळमधील आठ शाळांनी आधीच ही बसण्याची व्यवस्था स्वीकारली आहे आणि पंजाबमधील एका शाळेतही ती लागू केली आहे. त्यामुळे पुढील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल करून ही पद्धत अवलंबली तर त्याची विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता वाढीवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे.

'स्थानार्थी श्रीकुट्टन' चित्रपटाचे दिग्दर्शक विनेश विश्वनाथन यांनी सांगितले की, पंजाबमधील एका शाळेनेही ही कल्पना स्वीकारली आहे. मला आनंद आहे की याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.