जिल्हा परिषदेच्या कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्र जाहीर 

यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. 1 ते 10 पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर हे शिक्षक भरले गेले आहेत. त्यामुळे 1 हजार 100 पैकी 386 शिक्षकांची नियुक्ती केल्याने एकूण रिक्त जागांच्या 40 टक्के पदांवर शिक्षक कार्यरत आहेत.

जिल्हा परिषदेच्या कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्र जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

रत्नागिरी जिल्ह्यातील 386 जिल्हा परिषद (Ratnagiri Zilla Parishad) कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्र (Appointment letter to contract teachers) देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमधील काहीसा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्यातील दोन जिल्हा परिषदांनी कंत्राटी शिक्षक भरती (Zilla Parishad Contract Teacher Recruitment) थांबवल्याने भरती प्रक्रियेवर टांगती तलवार होती. मात्र, शासनाकडून त्यासंदर्भात कोणतेही स्थगितीचे आदेश देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 386 शिक्षकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.  

यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. 1 ते 10 पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर हे शिक्षक भरले गेले आहेत. त्यामुळे 1 हजार 100 पैकी 386 शिक्षकांची नियुक्ती केल्याने एकूण रिक्त जागांच्या 40 टक्के पदांवर शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यामुळे ग्रामीण भागामधून तक्रारीचे सूर उमटत होते. राजकीय पक्षांनीही आंदोलनाचा इशारा देत सत्ताधार्‍यांची अडचण केली होती. 

त्यामुळे तत्कालीन सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभा आणि विधानसभेमुळे कंत्राटी शिक्षक भरती थांबली. या गोंधळात नवीन शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, असे चित्र पाहायला मिळत होते. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने काही शाळांवर कामगिरीने शिक्षक नियुक्त केले. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊ लागला. याबाबत ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने रखडलेली कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरवात केली.

या नियुक्तीला राज्यभरातून विरोध होत असल्यामुळे पुन्हा त्यात अडथळा निर्माण झाला होता; मात्र शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेऊन जि. प. प्रशासनाने तातडीने थांबलेली प्रक्रिया वेगाने सुरू केली. पहिल्या टप्प्यात 105 जणांना नियुक्ती दिली असून, दुसर्‍या टप्प्यात 386 जणांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कायम रिक्त पदे असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरले गेलेले असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.