मोझे कॉलेजचे आणखी धक्कादायक वास्तव आले समोर; विद्यापीठाकडून काय कारवाई होणार?
विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार महाविद्यालयात मान्यता प्राप्त प्राचार्य व प्राध्यापक असणे आवश्यक आहे.तसेच मान्यता प्राप्त प्राचार्य नसेल अशा कॉलेजला परीक्षा केंद्र दिले जात नाही. परंतु, मोझे कॉलेज येथे परीक्षा केंद्र देण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
wagholi College: वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये (Parvatibai Genba College of Engineering) मध्यरात्री विद्यार्थ्यांना पुन्हा उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी दिल्याप्रकरणी प्राध्यापकासह त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ उडाली .मात्र, या घटनेची चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University)चौकशीसाठी गेलेल्या समितीच्या त्याहून धक्कादायक माहिती निदर्शनास आली.या कॉलेजमध्ये एकही शिक्षक किंवा प्राचार्य मान्यता प्राप्त नसल्याचे (No teacher or principal in the college is accredited) वास्तव समोर आले आहे.तसेच परीक्षा नियंत्रक (Controller of Examinations)म्हणून प्रचार्यच कामकाज पाहत होते.मात्र. त्यांचीही मान्यता एका वर्षासाठीच होती.त्यामुळे या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून विद्यापीठाला कारवाई करायची ठरली तर विद्यापीठ ही कारवाई कोणावर करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार महाविद्यालयात मान्यता प्राप्त प्राचार्य व प्राध्यापक असणे आवश्यक आहे.तसेच मान्यता प्राप्त प्राचार्य नसेल अशा कॉलेजला परीक्षा केंद्र दिले जात नाही. परंतु, मोझे कॉलेज येथे परीक्षा केंद्र देण्यात आले. या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियमानुसार घेऊन परीक्षेसंदर्भातील नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून उत्तरपत्रिका सीलबंद करून ठेवणे गरजेचे आहे. परंतु, कॉलेजमध्ये उत्तरपत्रिका सीलबंद करून ठेवल्या गेल्या नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे कॉलेजकाडून कोणत्याही नियमांचे पालन केले गेले नसल्याचे दिसून आले, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशीरा काही विद्यार्थीनी कॉलेजच्या आवारात फिरताना आढळून आल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून हा सर्व प्रकार उघडकीस आणला. दुपारी पेपर झालेला असताना ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते की मी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स-2 या विषयात नापास होऊ शकतो, अशा विद्यार्थ्यांकडून प्रतीक सातव यांनी 15 ते 35 हजार रुपये पैसे घेऊन त्यांना रात्री दोन वाजता पुन्हा पेपर लिहिण्यासाठी दिला होता.या सर्व घटनेची चौकशी करण्यासाठी विद्यापीठातर्फे समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीने गुरूवारी (दि.5) कॉलेजला प्रत्यक्ष भेट दिली.त्यात कॉलेजमध्ये एकही शिक्षक मान्यता प्राप्त नसल्याचे आणि प्राचार्य यांचीही मुदत संपल्याचे आढळून आले.तसेच परीक्षेचे कामकाज नियमानुसार होत नसल्याचे उघड झाले.त्यामुळे यात कोणा एका व्यक्तीवर जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार नाही तर कॉलेजवर कारवाई होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीकडून कारवाईबाबत कोणत्या शिफारसी केल्या जातात. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.