आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 'अभिव्यक्ती' हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवला जाणार.. 

या प्रकल्पाअंतर्गत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना कथा-कथन, नाट्य, कविता आणि दृश्यकला या माध्यमातून शैक्षणिक धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि भावनिक शिक्षणाला वाव मिळणार आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 'अभिव्यक्ती' हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवला जाणार.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आदिवासी विकास विभागाकडून (Department of Tribal Development) 'स्लॅम आउट लाउड' आणि 'गर्ल रायझिंग' या संस्थांच्या (Slam Out Loud' and 'Girl Rising' organizations) सहकार्याने आश्रमशाळांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक-भावनिक शिक्षणाचा स्तर वाढवण्यासाठी 'अभिव्यक्ती' हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवला जाणार (Expression is an innovative project to be implemented) आहे. या प्रकल्पाअंतर्गत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना कथा-कथन, नाट्य, कविता आणि दृश्यकला या माध्यमातून शैक्षणिक धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि भावनिक शिक्षणाला वाव मिळणार आहे.

https://eduvarta.com/Free-Competitive-Exam-Pre-Coaching-for-Adivasis-Candidates-Deadline-for-application-till-26-November

सचिव विजय वाघमारे व आयुक्त नयना गुंडे यांचा पुढाकार 

राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ४९७ शासकीय आश्रमशाळा असून, त्यामध्ये सुमारे २ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांच्या सामाजिक-भावनिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे व आयुक्त नयना गुंडे यांच्या पुढाकाराने 'अभिव्यक्ती' प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी कलेवर आधारित अभ्यासक्रम बनविण्यात आला आहे. 

लैंगिक समानतेची माहिती दिली जाणार 

या प्रकल्पाच्या पहिल्या वर्षी १० हजार विद्यार्थी, २०० शिक्षक आणि ४० एसईएल चॅम्पियन्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. 'अभिव्यक्ती'द्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षणाच्या तत्त्वांसोबतच हवामान बदल, तसेच किशोरवयीन मुलांमधील भावनिक जागरूकता आणि विश्लेषणात्मक विचार यांसारख्या महत्त्वपूर्ण कौशल्यांसह सक्षम बनविले जाणार आहे. लैंगिक समानतेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. मुलांना किशोरवयीन अवस्थेपासून सर्व बाबींची माहिती असल्यास त्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणी व समस्यांवर निश्चितपणे मात करता येवू शकते. तसेच त्यांचे पुढील आयुष्य या सर्व माहितीमुळे सुखकर होऊ शकते.