भावी मतदारांच्या जागृतीसाठी निवडणूक आयोग अन् शिक्षण मंत्रालयाचा होणार करार
विद्यार्थी जीवनापासूनच लोकशाहीत मतदाराची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण केली पाहिजे, असे कुमार यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भावी मतदारांना जागरूक करण्यासाठी आणि भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) पुढाकार घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आयोग लवकरच इयत्ता नववी आणि त्यापुढील वर्गातील विद्यार्थ्यांना लोकशाही म्हणजे काय हे शिकवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाशी (Education Ministry) करार करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
मतदार म्हणून त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्यासाठी भावी मतदारांना प्रशिक्षित करणे महत्वाचे आहे. यासाठी त्यांचे खास प्रशिक्षण वर्ग घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी जीवनापासूनच लोकशाहीत मतदाराची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण केली पाहिजे, असे कुमार यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.
विद्यार्थी नाही तर आता सी-नेट सदस्यांचे आंदोलन
कुमार म्हणाले, "विद्यार्थी जीवनापासूनच लोकशाहीत मतदाराची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण केली पाहिजे. मतदान म्हणजे काय, हे त्यांनी लहान वयातच समजून घ्यायला हवे. ते १८ वर्षांचे झाले आहेत आणि ते मतदार झाले आहेत, परंतू त्यांना मतदान, त्याचे आचार, त्याचे मोठेपणा याबद्दल फारशी माहिती नाही. मतदान कसे करावे, कोणाला मत द्यावे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, याची पार्श्वभूमी तयार नाही."
सामंजस्य कराराद्वारे लोकशाहीची मुळे मुलांच्या मनात खोलवर जावीत यासाठी निवडणूक आयोगाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची योजना आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे या कराराबाबत उत्सुकता वाढली असून करार कधी होणार, याबाबत कुमार यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली नाही.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k