आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीतील विद्यार्थ्याची केली हत्या; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवलं

आठवीच्या मुलाकडे शाळेत चाकू कसा आला? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीतील विद्यार्थ्याची केली हत्या; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवलं

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

हल्ली बालवयातील मुले राग अनावर झाल्याने टोकाचं पाऊल उचलताना दिसून येतात. याला पालकही तितकेच जबाबदार असतात. मुलांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मुले वाईट मार्गाला सहजरित्या जातात. अशीच एक धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या आठवी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने (A student studying in the eighth grade) इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची चाकू भोसकून हत्या (A student studying in class 10 was stabbed to death) केली आहे. त्यामुळे आठवीच्या मुलाकडे शाळेत चाकू कसा आला? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

आहिल्यानगरमधील शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सीताराम सारडा विद्यालयातील ही घटना आहे. विशेष म्हणजे दोन्ही विद्यार्थी एकाच भागात राहणारे आहेत. क्रिकेट या खेळाच्या करणावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. त्यानंतर शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. यात आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी घटनेची माहिती घेतली आणि हल्ला करणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले.