BMC भरती वादाच्या भोवऱ्यात; जाचक अटी मागे घ्या, अन्यथा कोर्टात जाऊ
मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये “पहिल्या प्रयत्नात पदवी उत्तीर्ण असणे" ही जाचक अट घातली आहे. पालिकेच्या या अन्याकारक जाचक अटींमुळे जवळपास ५ लाख विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज भरू शकणार नाहीत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई महानगर पालिकेने (BMC Recruitment) कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरू केली आहे. मात्र, ही भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अन्याकारक प्रक्रियेतील जाचक अटींमुळे जवळ जवळ ५ लाख विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकणार नाहीत. जर या जाचक अटी वेळीच मागे घेतल्या नाही तर, उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करण्याचा इशारा आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) यांनी दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये “पहिल्या प्रयत्नात पदवी उत्तीर्ण असणे" ही जाचक अट घातली आहे. पालिकेच्या या अन्याकारक जाचक अटींमुळे जवळपास ५ लाख विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज भरू शकणार नाहीत. याबाबत पाठपुरावा चालू असून, पुढील आठवड्यात आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहोत. जर प्रश्न सुटला नाही तर सह्यांची मोहीम, तसेच आंदोलन करावे लागेल. संविधानिक मार्गाने प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांवर आर्थिक भुर्दंड ना पाडता, स्वखर्चाने उच्च न्यायालयात रिट दाखल करू, असा इशारा धनंजय शिंदे यांनी दिला आहे.
त्यासाठी आम आदमी पक्षाकडून व्हाॅट्सअप मेसेज मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ९८६७६९३५८८ वर व्हॉट्सअप मेसेज करण्याची विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे. लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आम आदमी पार्टी शेवटपर्यंत संघर्ष करेल, असे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.
_______________________________
सध्या महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भयावह प्रश्न पाहता आपण या अटीच्या पुनरावलोकनासाठी योग्य ती कारवाई करावी व या अटीत बदल करावा. जेणेकरून अधिकाधिक योग्य आणि सक्षम उमेदवारांना या पदासाठी संधी मिळेल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल. अपेक्षा आहे की, आयुक्त या मागणीची दखल घेतल आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न समोर असलेल्या युवकांना अटी शिथिल करून दिलासा देतील.
आदित्य ठाकरे (आमदार ठाकरे गट)