11th Admission : अकरावीसाठी तब्बल १२ लाख ७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
ऑनलाईन प्रक्रिया राबवताना अनेक तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांना आल्या, व प्रवेशासाठी सप्टेंबर महिना उजाडण्याची वेळ आली. राज्यातील ९५२८ महाविद्यालयांत मिळून २१ लाख ५४ हजार ६९२ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी १४ लाख ७१ हजार ७४७ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली होती. तर आत्तापर्यंत १२ लाख ७८ हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केला आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात अकरावी प्रवेशाच्या (11th online admission process) विशेष फेरी अखेर शुक्रवार दिनांक २३ रोजी एकूण १२ लाख ७८ हजार ४४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित (Admission of 12 lakh 78 thousand 44 students confirmed) केले आहेत. काही विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित केलेला नाहीत त्यामुळे २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान प्रवेशाची अंतिम फेरी (Final round of admissions from August 26 to 30) राबवण्यात येणार आहे. अशा माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर (Director of Education Dr. Mahesh Palkar) यांनी दिली आहे.
मुंबई विद्यापीठाकडे परदेशी विद्यार्थ्यांचा ओढा, २५८ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश
शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने राबवण्यात आली. राज्यामध्ये अकरावीच्या जागा जास्त आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी असतानाही शिक्षण विभागाने केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा हट्ट धरला. ऑनलाईन प्रक्रिया राबवताना अनेक तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांना आल्या, व प्रवेशासाठी सप्टेंबर महिना उजाडण्याची वेळ आली. राज्यातील ९५२८ महाविद्यालयांत मिळून २१ लाख ५४ हजार ६९२ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी १४ लाख ७१ हजार ७४७ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली होती. तर आत्तापर्यंत १२ लाख ७८ हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केला आहेत.
ओपन टू ऑल विशेष फेरीत कला शाखा २३ हजार ९६१ वाणिज्य शाखा २४ हजार १४५ आणि विज्ञान शाखेसाठी ३६ हजार ९९५ असे एकूण ८५ हजार १०१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झाले होते. त्यापैकी ७८ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला आहे. यापैकी ७४ हजार ४४० प्रवेश CAP (केंद्रीय प्रवेश प्रक्रिया) फेरीतून आणि ४ हजार २१७ प्रवेश व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा अंतर्गत निश्चित झाले आहेत.