आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, लोणावळ्याजवळ घडली दुर्घटना 

परतीच्या प्रवासात भाताण बोगदा ओलांडल्यानंतर त्यांनी लेन क्रमांक तीनवरील कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता कार कंटेनरवर धडकली. या भीषण अपघातामध्ये कारमधील ओमकुमार, श्रेयांश आणि लय यांचा मृत्यू झाला. तर हितेश कुमार मीना, सोहम चव्हाण, सिद्धांत जेबल हे तीन विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, लोणावळ्याजवळ घडली दुर्घटना 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आयआयटी मुंबईसाठी (IIT Bombay) धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) लोणावळ्याजवळ तीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू (Accidental Death of 3 Students) झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे एक्सप्रेसवे पुन्हा एकदा ‘डेथ ट्रॅप’ ठरला असून, केवळ दोन दिवसांत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन दिवसांपुर्वी तीन जणांचा असाच अपघाती मृत्यू झाला होता. 

प्राथमिक माहितीनुसार, आयआयटी येथे शिक्षण घेत असलेले सहा विद्यार्थी लोणावळ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, लोणावळ्यापासून एकदी काही अंतरावरच असलेला भाताण बोगदा येथे त्यांची पोलो कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ओमकुमार बोरसे (वय 23), लय देशभ्रतार (वय 22) आणि श्रेयांश शर्मा या तीन तरुणांचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला तर इतर तीन जण जखमी आहे. हे सर्व मुले पवई येथील आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेत होते. या घटनेमुळे आयआयची मुंबईवर शोककळा पसरली आहे. 

परतीच्या प्रवासात भाताण बोगदा ओलांडल्यानंतर त्यांनी लेन क्रमांक तीनवरील कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता कार कंटेनरवर धडकली. या भीषण अपघातामध्ये कारमधील ओमकुमार, श्रेयांश आणि लय यांचा मृत्यू झाला. तर हितेश कुमार मीना, सोहम चव्हाण, सिद्धांत जेबल हे तीन विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची पनवेल तालुका पोलिसांनी नोंद केली आहे. दोन दिवसांपुर्वी  एका कंटेनरने समोरील पाच वाहनांना चिरडल्याने इनोव्हा कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर अवघ्या 24 तासांत पुन्हा तीन बळी गेल्याने एक्सप्रेसवेवरील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.