शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा ३५० वा वर्धापनदिन देशभरात साजरा होणार

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक रविवारी पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत झाली. या बैठकीत देशभरातून अभाविप च्या संघटनात्मक दृष्टीने ४४ प्रांतातून तसेच नेपाळ मधून एकूण ३५८ प्रतिनिधी सहभागी झाले होते.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा ३५० वा वर्धापनदिन देशभरात साजरा होणार
ABVP Meeting

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्धापनदिनाच्या गौरवशाली क्षणाला संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (ABVP) देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये (Students) “आनंदमयी सार्थक विद्यार्थी जीवन अभियानांतर्गत” विविध रचनात्मक कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. (ABVP Meeting)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक रविवारी पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत झाली. या बैठकीत देशभरातून अभाविप च्या संघटनात्मक दृष्टीने ४४ प्रांतातून तसेच नेपाळ मधून एकूण ३५८ प्रतिनिधी सहभागी झाले होते. दि. ९ जुलै रोजी अभाविप ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या संबंधित विषयांना अभाविप च्या विविध अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात पुढे आणायची कार्य योजना बैठकीत निश्चित झाली आहे. अभाविप स्थापनेच्या ७५ व्या वर्षाचे राष्ट्रीय अधिवेशन या वर्षी १ ते ३ डिसेंबर रोजी दिल्लीत होणार आहे.

शिक्षकांच्या वारंवार बदल्यांची प्रथा थांबणार; स्थानिक भागातच नोकरीला प्राधान्य

अभाविप च्या या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत चार प्रस्ताव पारित केले आहेत. राज्य सरकार व विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक क्षेत्राच्या गुणवत्तेवर भर दिला पाहिजे, शैक्षणिक परिसर हे आनंदमयी सार्थक विद्यार्थी जीवनाचे केंद्र बनायला हवे, भारत विरोधी वैश्विक षडयंत्राचा युवकांनी पराभव करायला हवा, स्व आधारित व्यवस्था निर्माणासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, अशा ४ मुद्द्यांवर हे प्रस्ताव आहेत.

अभाविप चे राष्ट्रीय महामंत्री श्री याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले की, अभाविपचा प्रवास विद्यार्थी हितांच्या व समाज हितांच्या सुवर्ण अध्यायांना सामावून आहे. सद्यस्थितीत देशात विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अभाविप सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण, स्वरोजगार, प्रादेशिक विद्यापीठांची स्थिती, शुल्क संबंधित विषयांवर मुख्यतः कार्य करण्यासोबत पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने युवा नेतृत्वात सकारात्मक दिशेने कार्य करेल.

बैठकीत पारित झालेल्या प्रस्तावात उल्लेख झालेल्या विविध मुद्द्यांना आम्ही संबंधित त्या त्या ठिकाणी आवाज उठवू.  विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक ज्ञान विकसित करून त्यांना स्टार्ट अप सुरू करणे तसेच रोजगार निर्मात्याच्या भूमिकेसाठी तयार करणे या दिशेने आपल्या शिक्षण संस्थांनी व शिक्षण क्षेत्रातील हितचिंतकांनी विचार करायला हवा, असे आवाहन शुक्ल यांनी केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo