NEET UG परीक्षेत बायोमेट्रिक्स न दिलेले विद्यार्थी परीक्षेत उपस्थित की अनुपस्थित : NTA ने केले स्पष्ट 

  बायोमेट्रिक्स नसताना विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांसह परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता, परंतु बायोमेट्रिक्स नसल्यामुळे  त्यांना अनुपस्थित मानले जाईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तथापि, ज्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक्स झाले नाहीत त्यांनाही उपस्थित मानले जाईल, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.

NEET UG परीक्षेत बायोमेट्रिक्स न दिलेले विद्यार्थी परीक्षेत उपस्थित की अनुपस्थित : NTA ने केले स्पष्ट 

एज्युवार्ता न्यूज  नेटवर्क 

रविवारी पार पाडलेल्या  NEET UG परीक्षेत महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा आदी राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रिक्स मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या  होत्या. (Complaints of biometrics machines being shut down at some examination centres  during NEET UG exam) आता बायोमेट्रिक्स न झाल्यामुळे परीक्षेत आपली उपस्थिती नोंदवली जाईल का? असा प्रश्न अनेक उमेदवारांना पडला आहे. याचे स्पष्टीकरण नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने दिले आहे. 
  बायोमेट्रिक्स नसताना विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांसह परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जात होता, परंतु बायोमेट्रिक्स नसल्यामुळे  त्यांना अनुपस्थित मानले जाईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तथापि, ज्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक्स झाले नाहीत त्यांनाही उपस्थित मानले जाईल, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.

रविवारी देशभरातील ५ हजारांहून अधिक केंद्रांवर नीट यूजीचे आयोजन करण्यात आले होते. काही केंद्रांवर  बायोमेट्रिक्स मशीन  सदोष असल्याचे सांगण्यात आले. परीक्षेनंतरही त्यांचे बायोमेट्रिक्स झाले नाही. या केंद्रावरील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. उमेदवारांना असे वाटले की त्यांना अनुपस्थित मानले जाईल आणि त्यांचे निकाल राखून ठेवले जातील. या प्रकरणावर तोडगा काढत  एनटीएने स्पष्ट केले की ज्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक्स करता आले नाहीत त्यांना देखील उपस्थित मानले जाईल. 
NEET UG मध्ये बायोमेट्रिक स्कॅन नसल्याच्या तक्रारींवर, NTA ने सांगितले की मुलांनी प्रवेशासाठी बायोमेट्रिक आणि eKYC फॉरमॅट निवडला होता. ज्या विद्यार्थ्यांनी eKYC द्वारे अर्ज केला होता, त्यांची प्रवेशिका OTP द्वारे करण्यात आली होती जी वैध आहे, ज्यांनी हा पर्याय निवडला नाही त्यांच्याकडे उपस्थितीसाठी बायोमेट्रिक पर्याय होता, तथापि तो बिघडल्यामुळे, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य धरली  जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची काळजी करण्याची गरज नाही.

 एनटीएने असेही स्पष्ट केले की ज्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक्स करता आले नाहीत त्यांच्या नावांसमोर एक वेगळा होलोग्राम लावण्यात आला आहे, जेणेकरून परीक्षेदरम्यान विद्यार्थी उपस्थित होते याची खात्री करता येईल. म्हणूनच ज्या मुलांचे बायोमेट्रिक्स झालेले नाहीत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, त्यांना अनुपस्थित मानले जाणार नाही किंवा त्यांचा निकाल रोखला जाणार नाही.