विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल, सर्व शाळांना सरकारचे नवे नियम जाहीर
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय विभागाने जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसोबत अनेक हिंसाचाराच्या घटना (Incidents of violence) घडल्या. त्यामुळे राज्याची देशपातळीवर असणारी प्रतिमा काहीसी मलिन झाल्याचे पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकारने सावध पाऊल उचलले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या (Safety of students) दृष्टीने राज्यभरातील सर्व शाळांना नवीन नियम लागू (New rules apply to schools) करण्यात आले आहेत.
नव्या नियमानुसार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय विभागाने जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार, महिला सेविकांची सकाळी आणि सायंकाळी अशी दोन वेळेस चाचणी होणे गरजेचे आहे.
अनधिकृत व्यक्तींना बसमध्ये प्रवेश करता देणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच खाजगी वाहनांमधून येणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच, पालकांनी चालकांची वैयक्तिक माहिती स्वत:कडे ठेवावी, चालकांची पार्श्वभूमी तपासून घ्यावी. तसेच बेपर्वा ड्रायव्हिंग आणि चालकाच्या भूतकाळातील अपघाताच्या घटनांचीही माहिती करून घ्यावी. विद्यार्थ्यांसाठी खाजगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशीलांची माहिती देणे आवश्यक आहे.