उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय, राज्यातील विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत 

राज्यभरातील तब्बल २८२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडविला होता. त्यावेळी सरकारने बाधित तालुक्यांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या होत्या. आता सरकारने आणखी एक महत्वाच निर्णय घेतला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय, राज्यातील विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने (Department of Higher and Technical Education) राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी, अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे आणि महाविद्यालयांचे परीक्षा शुल्क माफ (Examination fees waived for students from 282 talukas) करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी राज्यामध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता राज्य सरकार उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून एक शासन निर्णय प्रसिद्ध (Government decision published) करण्यात आला आहे. 

राज्यभरातील तब्बल २८२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडविला होता. त्यावेळी सरकारने बाधित तालुक्यांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या होत्या. आता सरकारने आणखी एक महत्वाच निर्णय घेतला आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय घेतला होता.

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयांची परीक्षा फी माफीची सवलत अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. अखेर सरकारने बुधवारी याबाबतचा जीआर काढला आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली सर्व अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयांतील बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना ही सवलत २०२५ ते २०२६ या शैक्षणिक वर्षासाठी लागू राहणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील २८२ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. या तालुक्यांमध्ये पुण्यातील हवेली आणि इंदापूर, नाशिकमधील कळवण, देवळा, इगतपुरी, मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड व येवला तालुक्यांचा समावेळ आहे. यांसह राज्यातील २८२ तालुक्यांचा समावेश या फी सवलतीत करण्यात आलेल्या आहे.